Jayant Patil : पुतळा उभारण्यासाठी जयदीप आपटेला किती लाख रुपये मिळाले? जयंत पाटील यांनी सांगितला आकडा

Jayant Patil : पुतळा उभारण्यासाठी जयदीप आपटेला किती लाख रुपये मिळाले? जयंत पाटील यांनी सांगितला आकडा

“शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने हे सरकार प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करतंय हे सिद्ध झालंय. रस्ते, पूल आणि सर्व मोठ्या प्रकल्पात भ्रष्टाचार होत आहे. मालवणमध्ये पुतळा झाला. शिल्पकाराचा अनुभव नव्हता तरीही त्याला पैसे दिले. त्याला फक्त 26 लाख मिळाले. बाकीचे पैसे कुठे गेले? त्याची चौकशी झाली पाहिजे. आपटे सामान्य माणूस असेल. तोही पोलिसांपासून लपू शकतो. पोलिसांना चकवा देऊ शकतो. तो सराईत गुन्हेगार नाही” असं जयंत पाटील म्हणाले. TV9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात ते बोलत होते.

“कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली असेल. ढासळली म्हणणं चुकीचं ठरेल. ती शून्य झाली. बदलापूरची घटना पाहा. नागपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पोलीस जुगार खेळत होते. वचक राहिला नाही. सरकारने नैतिकता गमावली आहे. सर्व विभागात पोस्टिंग देताना कशी होते ते जगजाहीर आहे. त्यामुळे नैतिकता राहिली नाही. पारदर्शकता नाही. धमकी दिली जात आहे. अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत” असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

‘महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला’

“आमची माफी मागा ही मागणी नव्हतीच. हा भ्रष्टाचार झालेला आहे. महाराजांचा पुतळा कोसळला. महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. त्याचं प्रायश्चित सरकारने घेतलं पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. आता हे माफी मागत फिरत आहेत. पण महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही” असा दावा जयंत पाटील यांनी केला.

‘माफी मागावी ही आमची कधीच मागणी नव्हती’

“राज्यातील जनता सर्व गोष्टी सहन करेल, पण महाराजांचा पुतळा पडणं कधीच सहन करणार नाही. त्यातील भ्रष्टाचार कधीच खपवून घेणार नाही. राज्यातील जनता त्यांना कधीच माफी देणार नाही. माफी मागावी ही आमची कधीच मागणी नव्हती. कारण महाराष्ट्र यांना ऐकणार नाही. हे त्यांना समजलं आहे. त्यामुळे माफी मागत फिरत आहेत. पण जनता त्यांना माफी देणार नाही” असं जयंत पाटील म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;