अटक झाली तरी चालेल, शिवरायांसाठी गोळ्या खायलाही तयार; शिवसेनेच्या रणरागिणी आक्रमक; हुतात्मा चौकात भगवं वादळ

अटक झाली तरी चालेल, शिवरायांसाठी गोळ्या खायलाही तयार; शिवसेनेच्या रणरागिणी आक्रमक; हुतात्मा चौकात भगवं वादळ

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळल्याने राज्यभरातील शिवप्रेमी दुखावले आहेत. या प्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. महाविकासाघाडीतर्फे आज जोडे मारा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह अनेक दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी झाले आहे. आता हुतात्मा चौकात अनेक शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या आहेत.

मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासआघाडीचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी हे हुतात्मा चौकात दाखल झाले आहेत. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. तुम्ही पोलीस जरी आणलात तरीही आम्ही इथून अजिबात हटणार नाही. जोडे मारो आंदोलन होणार म्हणजे होणारच, अशी प्रतिक्रिया महिला शिवसैनिकांनी दिली आहे.

महिला शिवसैनिक आक्रमक

फक्त आंदोलनच नव्हे तर मराठी माणसाला दडपण्याचे काम या भाजपने केले आहे. भारत जलाओ पार्टी आणि पार्टी तोडो घर तोड या पार्टीने केले आहे. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे तुकडे केले आहेत. गेल्या १० वर्षात काय राज्यात चांगलं आहे. या राज्यात मराठी माणूस सुखी नाही. मुलगी सुखी नाही. बदलापुरात काय झालं? याचेही राजकारण गिरीश महाजन आणि देवेद्र फडणवीसांनी केले. याचा करारा जबाब म्हणून आम्ही अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, कोणाला कंत्राट देता, मुख्यमंत्र्‍यांच्या मुलाच्या मित्रांना…घरची खेती आहे का? तुमच्या घरातला सातबारा आहे का? असा प्रश्न महिला शिवसैनिकांनी उपस्थित केला.

राणेंची मुलं जे काही वागतात कुणीही इथे यायचं नाही, आम्ही घरात घुसून मारु, असं ते सांगतात ही दादागिरी खपवून घेतली नाही. महाराष्ट्राचा सातबारा शिंदे फडणवीस पवारांच्या नावावर नाही. महाराष्ट्राचा सातबारा शाहू फुले आंबडेकर छत्रपती शिवरायांच्या नावावर आहे. ती मराठी माणसं इथे राहतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आम्ही मनं दुखावली आहेत. याचा करारा जबाब तुम्हाला मिळणार. तुम्ही पोलीस जरी आणलात तरीही आम्ही मराठी माणसं इथून अजिबात हटणार नाही. जोडे मारो आंदोलन होणार म्हणजे होणारच. अटक झाली तरी चालेल आम्ही महाराजांसाठी गोळ्या पण खायलाही तयार आहोत. हर हर महादेव, असेही महिला शिवसैनिकांनी ठणकावून सांगितले.

हुतात्मा चौकात भगवं वादळ

दरम्यान सध्या राज्यभरात महाविकासआघाडीच्या जोडे मारा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी हुतात्मा चौकात भगवं वादळ आल्याचे पाहायला मिळत आहे. हुतात्मा चौकातून लाखो कार्यकर्ते हे गेट वे ऑफ इंडिया पायी चालत या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी सरकारचा निषेध केला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;