पालघरमध्ये तिसरे विमानतळ उभारा; देवेंद्र फडणवीस यांची मोदींकडे मोठी मागणी

पालघरमध्ये तिसरे विमानतळ उभारा; देवेंद्र फडणवीस यांची मोदींकडे मोठी मागणी

मुंबई आणि हा सर्व भाग देशाची आर्थिक राजधानी झाला. कारण मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट आहे. त्यामुळे आपण नंबर वन ठरलो. आता त्यापेक्षा तिप्पट मोठे बंदर वाढवणमध्ये होत आहे. या बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे होणार आहे. १९८० च्या दशकात वाढवण बंदर करण्याचे स्वप्न पाहिले गेले होते. पण ते २०२४ मध्ये प्रत्यक्षात उतरत आहे. मोदी यांचे सरकार आले आणि वाढवण बंदर सुरू करण्याच्या कामाला वेग आला. कोर्टाच्या नोटिफिकेशनमधून वाढवण बंदर बाहेर आले. नरेंद्र मोदी यांनी त्याला नॅशनल पोर्टचा दर्जा दिला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आता पुढील २०० वर्ष हे बंदर राहील आणि मोदींचं नावही राहील. भारताला पुढे नेण्याचे काम मोदींनी केले. हे बंदर पाहून लोक म्हणतील. जगातील सर्व एअरपोर्ट रिक्लमेन्शन करून तयार केले आहे. येत्या काळात मुंबई वाढणार आहे. वसई विरारमध्ये वाढणार आहे. आपण बंदराचं रिक्लेमेन्शन करणार आहोत. या ठिकाणी एअरपोर्टचेही रिक्लेमन्शन केले पाहिजे. या ठिकाणी तिसरे विमानतळ झाले तर महाराष्ट्र अधिक पुढे जाईल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अजित पवार यांचे आश्वासन, एकाला वाऱ्यावर सोडणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. 76 हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी ते आले. त्यावेळी काही स्थानिकांकडून या बंदराला विरोध होत असल्याचे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली. अजित पवार म्हणाले की, वाढवण बंदरामुळे परिसराचा चौफेर विकास होणार आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. विकासासाठी थोडी पावले मागे पुढे जावे लागणार आहे. परंतु मी तुम्हाला आश्वासन देतो वाढवण परिसरातील एकाही व्यक्तीला वाऱ्यावर सोडणार नाही.

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत वाडवण बंदरच्या कामाला मंजुरी देण्यात आली. गेली ३५ वर्षे वाढवण बंदर होण्याचा प्रयत्न सुरू होता. पण नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच हे काम होण्याचे इतिहासात लिहिले असेल. या बंदरामुळे दोन ते तीन लाख रोजगार निर्मिती होणार आहे. जगातील दहा बंदरांपैकी एक बंदर असणार आहे. त्याचा फायदा महाराष्ट्र आणि पालघरला होणार आहे. या ठिकाणी मत्स्यपालन होत आहे. समुद्रापासून दहा किलोमीटर आतमध्ये हे बंदर होणार आहे. त्याचा मोठा फायदा आम्हाला होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;