तीन पक्षांसोबत या पक्षांनीही मविआसोबत यावे…विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी उघडले पत्ते

तीन पक्षांसोबत या पक्षांनीही मविआसोबत यावे…विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी उघडले पत्ते

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी तीन पक्षांची बैठक होणार होती. परंतु बदलापूरचा विषय समोर आल्यामुळे ती बैठक स्थगित झाली. आता 27 ऑगस्ट रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच महाविकास आघाडीतील या तीन पक्षांसोबत डावे पक्ष आणि इतर पक्षांनी यावे, असे शरद पवार यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. लवकरात लवकर मतदार संघाचे निर्णय द्या. लोकांसमोर पर्याय द्या, अशी आपली अपेक्षा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

बदलापूर घटनेबाबत बोलतान शरद पवार म्हणाले की, बदलापुरातील घटना म्हणजे लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या जनभावना होत्या. त्यामुळे त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे योग्य नाही. राज्य सरकार आणि गृहखात्याने त्याबाबत संवेदनशील व्हावे.

बदलापूर प्रकरण ही धक्का देणारी घटना आहे. या प्रकरणी राज्य सरकारने सतर्क राहून कठोर भूमिका घेतली पाहिजे. हा प्रकार बदलापूरपर्यंतच मर्यादीत नाही. मुलींवर अत्याचार, बालिकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा जागरूक करावी लागणार आहे. या प्रकरणी मी कोणाला दोष देत नाही. सगळ्यांनी शांततेत काम करावे. या घटना वाढत आहेत थांबत नाही. त्यामुळे पोलिस दलाने अधिक संवेदनशील काम केले पाहिजे. परत गुन्हे दाखल करण योग्य नाही.

ही सुरक्षा केंद्राने दिली

शरद पवार यांना पुन्हा झेड प्लस सुरक्षा दिली. विधानसभा निवडणुकीमुळे ही सुरक्षा दिली का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारले. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, या प्रकरणी मी जास्त बोलू इच्छित नाही. सुरक्षा राज्याने किती वर्ष दिली आहे. केंद्राने ही सुरक्षा दिली आहे. केंद्राने तीन लोकांना सुरक्षा दिली. त्यात माझे एक नाव आहे. केंद्र सरकारकडे आलेल्या माहितीनुसार, ही सुरक्षा दिली.

सहकार चळवळीत राजकारण नको

सहकारी चळवळीत राजकारण कधी येत नव्हती. यापूर्वी अस घडले नव्हते. राज्य सरकार एक नीती तयार करते सगळ्या अडचणीत असलेल्या कारखान्यांना मदत मिळत होते. पण आता तसे होताना दिसत नाही. आता राजकारण होत आहे. शपथ घेताना आपण न्यायाने राहू, असे होत पण तसे आता होताना दिसते नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;