Badlapur Protest : प्रशिक्षण दिलेल्यांच्या बदल्या होतात, किती पोलिसांना प्रशिक्षण द्यायचे?, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष संतापल्या

Badlapur Protest : प्रशिक्षण दिलेल्यांच्या बदल्या होतात, किती पोलिसांना प्रशिक्षण द्यायचे?, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष संतापल्या

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एफआयआर’ दाखल करण्यात जो विलंब झाला त्याला शाळा, पोलीस ठाण्यासह सर्वच जण जबाबदार आहेत असे परखड बोल बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांनी सुनावले आहेत. गुन्हा 12 तारखेला घडला होता. 13 तारखेला त्या लहान मुलींनी तिच्या आईला कम्प्लेंट केली. 13 तारीखेला आणि त्यांना कळलं की असं नक्कीच काही प्रकार झालेला आहे. महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र विभाग असायला हवा, गुन्हे शाखेप्रमाणे स्ट्रक्चर तयार करायला हवा, जो केवळ महिला आणि मुलांसाठी काम करेल असेही सुशीबेन शाह म्हणाल्या आहेत.

प्रत्येक पोलीस ठाण्यात एक बालसंरक्षण अधिकारी असायला हवा. प्रत्येक शाळेत ‘सखी सावित्री समिती’ असावी अशी आमची मागणी आहे. आपण सावित्री समितीचा रिपोर्ट मागणार आहोत. बालकल्याण समितीबद्दल लोकांना माहिती नाही, प्रत्येकाला त्याबद्दल सांगावे लागेल. प्रत्येक वॉर्डात बालसभा घ्याव्यात, या सभेत मुलांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. या सर्व प्रश्नांबाबत मी आज पत्र देणार असून सात दिवसांत उत्तरे मागणार आहोत असेही सुशीबेन शाह यांनी म्हटले आहे.

आरोपी 15 दिवस शाळेत हजर होता, त्या 15 दिवसांची माहिती आपण घेणार आहोत. निलंबित करून काहीही होणार नाही, तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे,आरोपीवर POCSO मध्ये FIR ताबडतोब नोंदवला पाहीजेत.विशेष विभागाकडे फाईल यापूर्वीच पाठवण्यात आली असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. आज आपण स्वत: मुलीच्या कुटुंबीयांशी बोलणार आहोत, त्यांची मानसिक स्थिती अत्यंत बिकट आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्रेही लिहिली आहेत, आम्ही कायद्यानुसार यंत्रणा राबवू.अशा लोकांना शाळेत ठेवण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांना असे संबोधणे चुकीचे

चाईल्ड प्रोटक्शन हेल्पलाईन 24 बाय 7 कामाला असली तरच फरक पडेल आणि लेट महाराष्ट्र बी द फर्स्ट ज्यांनी असे एक स्ट्रक्चर उभा केलेला आहे, मी परत एकदा आवाहन करते की सीएम साहेबांना आणि देवेंद्र फडणवीसांना अशी वक्तव्य व्हायला नकोत. राजकीय व्यक्ती चुकीचे बोलत आहेत. पत्रकारांना असे संबोधणे चुकीचे आहे, त्यांनी अशी वक्तव्यं करु नयेत. अशा घटनांविरोधात मी नेहमीच आवाज उठवते. पण आता ते खूप झाले आहे. पोलिसांना प्रशिक्षण देऊन बदल्या केल्या जातात, ते किती जणांना प्रशिक्षण देणार? गुन्हे शाखेसारखा विभाग निर्माण करण्याची मागणी केली जात आहे. अशा या प्रकारच्या तक्रारीसाठी काम करेल असे फोर्स तयार करायला हवा, संवेदनशील पोलिसांची नियुक्ती अशा कामासाठी केली गेली पाहीजेत असेही शाह म्हणाल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;