मराठा म्हणजे वाघ आणि सिंह, आरक्षण कुठे घेऊन बसलात?, आरक्षणावरुन संभाजी भिडे यांची पलटी

मराठा म्हणजे वाघ आणि सिंह, आरक्षण कुठे घेऊन बसलात?, आरक्षणावरुन संभाजी भिडे यांची पलटी

मराठा आरक्षणावरुन आता संभाजी भिडे गुरुजी यांनी पलटी खाल्ली आहे. याआधी संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची जालना येथे मागे भेट घेतली होती. त्यावेळी या आंदोलनाचा शेवट मराठ्यांना आरक्षण मिळण्यातच व्हायला हवा असे वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केले होते. मराठा आरक्षणाला पाठींबा देणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी यांनी अचानक मराठ्यांनो आरक्षणाचे कुठे घेऊन बसलाय, मराठा म्हणजे वाघ आणि सिंह ? सिंहाने जंगल सांभाळायचे असते.मराठ्यांना उभा देश चालवायाचा आहे. हे आरक्षणाचे कुठे घेऊन बसलात अशी विधाने संभाजी भिडे गुरुजी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेली काही वर्षे मराठा समाज आंदोलन करीत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. या उपोषणानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे यांना आश्वासन देत त्यांचे उपोषण समाप्त केले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे. यानंतर सगेसोयरे यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळायला हवे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश देखील काढला होता. परंतू ओबीसी नेत्यांनी ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध केला आहे.

भिडेंपासून मराठे दूर जातील

संभाजी भिडे गुरुजी यांनी आज अचानक मराठा आरक्षणावरुन पलटी मारली. ते म्हणाले की मराठ्यांनो आरक्षणाचे कुठे घेऊन बसलात? मराठा म्हणजे वाघ आणि सिंह आहेत. सिंहानी जंगल सांभाळचे असते. तसेच मराठ्यांना हा देश सांभाळायचा आहे. आरक्षण काय तु्म्ही घेऊन बसलाय असेही संभाजी भिडे म्हणाले आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी हे संभाजी भिडे यांच्या तोंडातून देवेंद्र फडणवीस बोलत आहे. यात भिडे गुरुजींचा यांना काहीही दोष देण्यात काही अर्थ नाही. संभाजी भिडे यांच्याकडे जी गर्दी आहे ती सर्व मराठे तरुण आहेत. आता संभाजी भिडेंकडे कोणताही मराठा जाणार नाही. देवेंद्र फडणवीस स्वत:ला पण राजकारणातून संपवत आहेत आणि आता संभाजी भिडे यांनाही संपवायला निघाले आहेत अशीही टिका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

25  ऑगस्ट रोजी सांगली बंद

बांगलादेशात सत्तापालट झाला आहे. तेथे हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेध करण्यासाठी 25  ऑगस्ट रोजी सांगलीत  कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची घोषणा करण्यासाठी  संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषदत बोलविण्यात आली होती.  श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हा बंद पुकारण्यात आला आहे, अशी माहिती संभाजी भिडे यांनी दिली आहे. तसेच बांगलादेशात हिंदूंवर जो अत्याचार सुरू आहे, त्याविरोधात केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलावीत, अशी  मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;