‘तो’ एक मुद्दा एवढा महागात पडेल वाटलं नव्हतं? अजित पवारांनी सांगितलं लोकसभेमध्ये कुठे फटका बसला

‘तो’ एक मुद्दा एवढा महागात पडेल वाटलं नव्हतं? अजित पवारांनी सांगितलं लोकसभेमध्ये कुठे फटका बसला

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा तर अजित पवार गटाती जनसन्मान यात्रा सुरू आहे. आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात काही यश मिळालं नाही. महाविकास आघाडीने जास्त जागा जिंकल्या होत्या. अशातच लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका कशामुळे फटका बसला? यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.

संविधान बदलण्याचा मुद्दा एवढा महागात पडेल असं वाटलं नव्हतं. थोडी जाणीव होती, पण एवढा फरक पडेल असं वाटत नव्हतं. बिहारमध्ये हे झालं नाही. मध्यप्रदेशात झालं नाही. अपप्रचाराचा तिथे परिणाम नाही झाला. चंद्राबाबू नायडू, शिवराज चौहान आणि नितीश कुमार, चिराग पासवान सोबत होते. लीडरशीप तिथे स्ट्राँग होती त्यामुळे त्यांनी निवडणुकीत प्रचार केला पण आम्ही महाराष्ट्रात कमी पडलो. आघाडी सरकारमुळे नाही, असं अजित पवार म्हणाले.

आम्ही पूर्ण प्रयत्न केला होता. पण संविधान बदलण्याचा आणि आरक्षण जाण्याचा मुद्दा लोकांच्या मनातून काढला गेला नाही. लोकांना ते खरं वाटलं. त्यामुळे आमच्यापासून मतदार दुरावला. सीएए कायद्याबाबत अपप्रचार झाला. आपल्या देशाच्या बाहेर राहणाऱ्या भारतीयांना आणण्यासाठी सीएए कायदा आणला होता. देशाच्या बाहेर20-25 वर्ष राहणाऱ्यांना देशात आणण्यासाठी कायदा नव्हता. पण मायनॉरिटीला वाटलं आपल्याला देशातून हाकलून देण्यासाठी हा कायदा आला आहे, असं वाटलं. आपल्याला हटवून दुसऱ्यांना आत घेणार आहेत, असं त्यांना वाटलं होतं. त्यामुळे अल्पसंख्याक भयभीत होते, अजित पवारांनी सांगितलं.

सुमित्रा पवारांना उभं करणं चुकलं- अजित पवार

माझ्या मनात जे येतं ते मी बोलतो. मी 35 वर्षापासून राजकारणात आहे. मला कुणी तरी विचारलं. मी निवडणुकीनंतर बराच विचार केला. हे कसं झालं? का झालं? त्याला मीच जबाबदार आहे. मी कुणाला दोष देत नाही. मला असं नव्हतं करायला पाहिजे. त्यामुळे मी बोललो. कुटुंबासाठी माझा निर्णय चुकीचं होतं. आमचे आजी आजोबापासून आम्ही सर्व एकत्र राहतो. त्यामुळे माझ्या मनात आलं. कुटुंबा कुटुंबात जेव्हा एकमेकांच्या विरोधात उभं राहिलो तरी कोणी तरी हरणार होतं. जिंकणारं आणि हरणारे कुटुंबातीलच होते. कुटुंबातील लोकांना त्रास होत होता. त्यामुळे मी बोललो,असं अजित पवार म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;