निवडणूक जिंकून न आलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, कारण… अजित पवार यांचा थेट हल्ला

निवडणूक जिंकून न आलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, कारण… अजित पवार यांचा थेट हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी मुख्यमंत्रीपदावरुन अजित पवार यांनी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. निवडणूक न लढवता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. कारण त्यांच्याकडे बहुमताचा आकडा होतो. तसेच नशीबाचा भाग असतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस पुढे गेले…

राज्यात मुख्यमंत्रीपदाची संधी कनिष्ठ असलेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मिळाली. परंतु आपणास मिळाली नाही, या वक्तव्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम राजकीय कार्यक्रम नव्हता. त्यावेळी मी १९९१ मध्ये राजकारणात आलो. देवेंद्र फडणवीस १९९९ मध्ये तर एकनाथ शिंदे २००४ मध्ये राजकारणात आले. हे लोक मुख्यमंत्री बनले. हे मी हसतहसत बोललो. तसेच निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री बनले. कारण त्यांच्याकडे आकडा होता.

राज्यात कुणालाही मुख्यमंत्री बनायचे असेल तर त्यांच्याकडे आकडा पाहिजे. तसेच हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे. आजपर्यंत त्यांनी जे काम केले तोही भाग आहे. पृथ्वीराज चव्हाण खासदार होते. केंद्रात मंत्री होते. तरीही ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर ते एमएलसी बनले. उद्धव ठाकरेही आधी मुख्यमंत्री बनले. नंतर एमएलसी बनले. असेही कधी कधी होते असते.

विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळणार

आधी महायुती म्हणून पहिल्यांदा आम्ही विधानसभा लढत आहोत. आम्हाला बहुमत मिळेल हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही मतदारांशी संपर्क साधत आहोत. त्यांना आम्ही केलेली कामे दाखवून देत आहोत. नुकतीच जळगावमध्ये आमचा मोठा कार्यक्रम झाला. केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार होते. आम्ही आमचं काम सुरू केलं आहे. विरोधकांनीही त्यांचे काम सुरू केले आहे. राज्यातील मतदारांना आकर्षित करण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि आमचा पक्ष यांच्यात स्पर्धा नाही. जयंत पाटील, अमोल कोल्हे यांना जे वाटतं ते करत आहेत. त्यांच्या हिशोबाने ते पुढे जात आहे. आमच्या हिशोबाने आम्ही पुढे जात आहोत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;