Sanjay Raut : मनसेच्या राड्यानंतर संजय राऊत म्हणाले, हात जोडून विनंती करतो की… नेमकी प्रतिक्रिया काय?

Sanjay Raut : मनसेच्या राड्यानंतर संजय राऊत म्हणाले, हात जोडून विनंती करतो की… नेमकी प्रतिक्रिया काय?

बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. बीडमध्ये सुरूवात झाली आता मुंबईत शेवट करू, असा इशारा मनसैनिकांनी दिला होता. त्याचा प्रत्यय काल ठाण्यात पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या तफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकले. मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे सेना भिडली. त्यावर आज संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांनी एक मोलाचा सल्ला पण दिला आहे. काय म्हणाले संजय राऊत?

ते तर दिल्लीच्या अब्दालीची माणसं

भगवा सप्ताह जल्लोषात पार पडला. उद्धव ठाकरे यांचं ठाण्यात येताना जागोजागी स्वागत झालं. ठाण्यात झालं. सभागृह भरगच्च होतं. भगवा सप्ताह ज्या पद्धतीने साजरा व्हायला व्हावा तसा तो साजरा झाला. त्यानंतर जो प्रकार झाला. ते दिल्लीच्या अब्दालीचे लोकं होते. अहमद शाह अब्दालीने महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपारी दिल्या त्यातील एक सुपारी होती, असा घणाघात राऊत यांनी घातला.

हात जोडून विनंती की…

बीडमध्ये मनसेप्रमुखाबाबत प्रकार घडला. त्यांच्या गाडीवर कुणी तरी काही फेकलं. त्याचा शिवसेनेचा काही संबंध नाही. स्थानिक लेव्हलला मराठा म्हणून आंदोलन झालं. त्याची प्रतिक्रिया आहे. पक्षाचा संबंध नाही. पण कालच्या प्रकाराला अॅक्शन रिअॅक्शन म्हणता कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल. माझी त्यांना पक्षातर्फे हात जोडून विनंती आहे. तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकलं असेल म्हणून तुम्ही वाचला. जर तुम्ही मर्दाची औलाद असता तर समोर आले असते. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, पक्षाकडून, शिवसैनिकांकडून की , पुन्हा अशी कृत्ये अंधारात, लपूनछपून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका. तुमच्या घरात तुमचे आईवडील वाट पाहत आहेत. तुमची मुलंबाळं वाट पाहत आहे. तुमची पत्नी वाट पाहत आहेत, असा इशारा त्यांनी दिला. मराठी लोकांमध्ये मारामारी लावण्याचं काम अब्दाली करत आहेत. त्यासाठी काही कोटींची सुपारी राज्यातील तीन नेत्यांना दिली आहे. त्यांचं काम गेल्या काही काळापासून सुपारी घेऊन केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

ठाण्यातील वातावरण बदलत आहे

या स्तरावर येत असाल, अहमद शाह अब्दाली सुपाऱ्या देऊन वाट पाहत आहेत, महाराष्ट्रात आपआपसात गोंधळ करण्यासाठी अब्दालीने तीन नेत्यांना सुपारी दिली. पण काही फरक पडत नाही. उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. ठाण्यातील वातावरण बदलत आहे. विधानसभेत आमचं दमदार पाऊल पडत आहे, असा दावा त्यांनी केला.

तर शिवसैनिक काय आहे हे दिसलं असतं

पण त्यात अशा प्रकारे दुष्ट लावण्याचं काम अब्दालीचे लोक करतात. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेत नाही. फक्त महाराष्ट्राचे शत्रू अब्दालीच्या इशाऱ्यावर चालले आहे. हे फडणवीस आणि शिंदेंना माहीत आहे. तुम्ही ॲक्शन रिॲक्शन काय म्हणता. थांबा दोन महिने तुम्हाला कळेल. सत्तेची मस्ती दाखवू नका. नशीब त्यांचं ते समोर आले नाही. गांडू सारखं काळोखात लपून करत आहेत. समोर असते तर शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे हे दिसलं असतं, असा खणखणीत इशारा त्यांनी यावेळी दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;