Maharashtra News Live : जरांगेंचं समाधान होत नाही, अपेक्षा जास्त – रावसाहेब दानवे
दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. आज राज्यातील निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याबाबत दिल्लीत चर्चा होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषीत करावा, अशी मागणी ठाकरेंकडून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनोज जरांगे यांची पुण्यात ११ ऑगस्ट रोजी शांतता रॅली निघणार आहे. त्यासाठी पुण्यातील मराठा समाजाच्या बांधवांकडून या रॅलीच्या तयारीला सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List