लाडकी बहीण योजनेचे केवळ एक, दोन हप्तेच दिले जाणार…शरद पवार यांनी व्यक्त केली भीती

लाडकी बहीण योजनेचे केवळ एक, दोन हप्तेच दिले जाणार…शरद पवार यांनी व्यक्त केली भीती

राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. परंतु राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे निवडणुकीपुरते एक, दोन हप्ते महिलांना दिले जातील. त्यानंतर दिला जाणार का? हा प्रश्न आहे. सरकारला या योजनेचा लाभ जनतेला द्यायचा होता तर ही योजना आधीच का जाहीर केली गेली नाही, अशी चर्चा लोकांमध्ये आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

…तर लोकसभेसारखेच निकाल

आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे, असे मत जनतेचे झाले आहे. यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला संधी आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही एकसंघ पर्याय दिला होता. विधानसभेसाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याला मूर्त स्वरुप आले पाहिजे. मूर्त स्वरुप आले तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल. नाही आले तर आजच्या राज्यकर्त्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. परंतु लोकसभेसारखा स्पष्ट निकाल लागणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. लोकसभेसारखा निकाल येण्यासाठी महाविकास आघाडीत एकी हवी आहे. लोकांना आता पर्याय द्यावा, असे तिन्ही पक्षांत एकमत आहे.

डाव्या पक्षांनाही स्थान द्यावे

संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीतील जागा वाटपावर चर्चा होणार आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली. त्यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत यांनी तडजोडीसाठी जी समिती करायची त्याची नावे दिली. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची नावे दिली. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी काही नावे दिली आहे. त्यांच्या बैठकीची प्रक्रिया १२ तारखेनंतर सुरू होईल. काही झालं तरी जागेचा निर्णय घ्यावा, एकवाक्यता ठेवावी आणि लोकांना पर्याय द्यावा हे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकी डाव्या पक्षांनी मदत केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना एकही जागा दिली नव्हती. आता त्यांच्यासाठी काही जागा सोडल्या पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबरोबर लिंगायत, धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण द्यावे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. धनगर, लिंगायत, मुस्लिम हे त्या प्रक्रियेत आले, तर ती परिस्थिती बदलेल आणि कटुता राहणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;