Raj Thackeray : धर्म, स्मशानभूमी, अंत्यसंस्कार यावर राज ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray : धर्म, स्मशानभूमी, अंत्यसंस्कार यावर राज ठाकरे काय म्हणाले?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वांद्रे रंगशारदा येथे पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा सुरु आहे. या मेळाव्याला राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी धर्म, प्रथा, परंपरा या बद्दल महत्त्वाच भाष्य केलं. “काही गोष्टी अशा आहेत, तेव्हा परंपरा, प्रथा म्हणून पडलेल्या असतील. पण त्यात आता राज्य सरकार केंद्र सरकारने जातीने लक्ष घालणं गरजेच आहे. बेसुमार जंगलतोड होतेय. पाऊस पडत नाहीय. मराठवाड्यावरच्या रिपोर्टबद्दल मी मागे बोललो होतो. सध्या पाण्याच जे मराठवाड्यात सुरु आहे, ते असच सुरु राहिलं, तर पुढच्या 30-40 वर्षात मराठावाड्याच वाळवंट होईल. मराठवाड्याच वाळवंट झाल्यानंतर, पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती आणण्य़ासाठी 150 ते 200 वर्ष लागतील” असं राज ठाकरे म्हणाले.

“देशात बेसुमार जंगलतोड सुरू आहे. हजारो एकर जमिनीची जंगलतोड सुरू आहे. मी आल्यावर या गोष्टींचा विचार करत होतो. आपल्यातील काही गोष्टी सुधारणं गरजेचं आहे. या देशात बेसूमार जंगलतोड होते, ती कशासाठी होते. आपल्याकडे होळी आली की सांगतो जंगलतोड करू नका. आपण आपल्या धर्माकडे पाहिलं पाहिजे. जेव्हा आपल्या धर्मातील हजारो लोकं मरतात तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार लाकडाने होतो. त्यासाठी जंगलतोड होते. लाकडाचा सर्वाधिक वापर स्मशानभूमीत होतो” असं राज ठाकरे म्हणाले.

‘त्याशिवाय ही गोष्ट थांबणार नाही’

“विद्यूत दाहिनीत आपण अंत्यसंस्कार करत नाही. ते प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे जंगलतोड थांबवली पाहिजे. काही गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत. ज्यांच्याकडे जंगलं आहेत, ते लोक जमिनीखाली माणसं पुरत आहेत आणि आपण राजरोस जंगलतोड करत आहोत. सरकारने विद्युत दाहिन्यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे. त्याशिवाय ही गोष्ट थांबणार नाही” असं राज ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;