एकीकडे वाहतूक कोंडी, दुसरीकडे लाईफलाईन कोलमडली, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचा ‘लेट’मार्क

एकीकडे वाहतूक कोंडी, दुसरीकडे लाईफलाईन कोलमडली, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचा ‘लेट’मार्क

Mumbai Rains Update : सध्या मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतील चर्चेगट, सीएसएमटी, भायखाळा, सायन, माटुंगा, चेंबूर, कुर्ला, दादर या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहरासह उपनगरातही पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरातही जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. त्यातच आता हवामान विभागाने सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकलमुळे मुंबईकरांचा खोळंबा

मुंबईत सुरु असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवांवर झाला आहे. मुंबईतील मध्य रेल्वेवरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. तर पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूकही कोलमडली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटे उशिराने धावताना दिसत आहे. त्यासोबतच हार्बर मार्गावरील सर्व लोकल या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईची लाईफलाईन कोलमडल्यामुळे कामासाठी निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे.

मोठी वाहतूक कोंडी

तर दुसरीकडे आनंद नगर जकात नाका ते मुलुंड टोलनाक्याच्या पुढे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. एकीकडे पडणारा पाऊस, सिग्नल यंत्रणा, टोल नाका आणि रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावलेली आहे. या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकांनाही बसत आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचाऱ्यांना आज लेटमार्क लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कशाप्रकारच्या उपाययोजना केल्या जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोकणात पावसाचा जोर वाढला

रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी रात्री पावसाचा जोर वाढला. किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. परंतु दक्षिण रत्नागिरीत पावसाच्या जोरदार सरी सुरु आहे. किनारपट्टी भागात ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९ ते २१ जुलैपर्यंत कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार-अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राज्याच्या आंतर भागात, मध्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, कोल्हापूर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याचे दिसत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;