..तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही… आमदार बच्चू कडू यांची मोठी घोषणा

..तर मी आमदारकीची निवडणूक लढणार नाही… आमदार बच्चू कडू यांची मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. युती अन् आघाड्यांमध्ये जागा वाटपावर प्राथमिक बोलणी केली जात आहे. लहान पक्ष आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. बच्चू कडू यांनी सांगितले की, १९ तारखेला महायुती सरकारला आमच्या मागण्याचे निवेदन देणार आहोत. सरकारने आमच्या मागण्या केल्या तर माझी विधानसभा निवडणुकीतून माघार असणार आहे. माझी जागा महायुतीला देणार आहे.

काय म्हणाले बच्चू कडू

मी महायुती मध्ये नाही. कोणी सांगितले तुम्हाला मी महायुतीमध्ये आहे. आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहे.

काय आहेत बच्चू कडू यांच्या मागण्या

पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमीमधून करावी, 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांच्या शेतमालास भाव द्यावा, दिव्यांगांना दरमहिना मानधन द्यावे, गरीब व श्रीमंतामधील विषमता वाढत चालली त्यात समता आणावी या मागण्या सरकारकडे करणार आहे. त्यासाठी १९ जुलै रोजी सरकारला निवेदन देण्यात येणार आहे.

राजू शेट्टी बच्चू कडूंसोबत युतीच्या तयारीत

महाविकास आघाडी व महायुती हे दोन्ही घटक पक्ष छोट्या पक्षांना संपवण्याचे काम सध्या सुरू केले आहेत. लोकसभेमध्ये मला उबाटा गटाने पाठिंबा दिला नाही. आम्ही छोटे-मोठे पक्ष एकत्रित येऊन एक नंबरची आघाडी करू. बच्चू कडू हे माझे चांगले मित्र आहेत ते जर आले तर त्यांच्यासोबत आम्ही आघाडी करू, असे स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

छोट्या- मोठ्या पक्षांना किंवा संघटनांना संपवायचे मोठ्या पक्षांची पर्याय व्यवस्था तयार करून ठेवण्याची प्रवृत्ती आहे. छोट्या मोठ्या पक्षांची अशीच कुचंबना होत असते. स्वाभिमानी शेतकरी संघटना ज्यावेळेला महायुतीमध्ये होती त्यावेळेला आमची परिस्थिती काय झाली. रस्त्यावरची लढाई छोटे पक्ष लढत असतात. तिसरी आघाडी बिघाडी आमच्या डोक्यात काही नाही छोट्या पक्षांचे आमदार वाढवणे हेच आमच्यासमोर सध्या उद्दिष्ट आहे. तिसरी आघाडी म्हणजे थोतांड आहे. यामुळे विधानसभेला बच्चू कडू आणि मी एकत्रित येऊ शकतो राजू शेट्टी यांनी म्हटले.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;