मुंबईकरांसाठी गुडन्यूज, दोन दिवस पडलेल्या पावसाने केली मोठी कमाल

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, दोन दिवस पडलेल्या पावसाने केली मोठी कमाल

Mumbai Dam Water Level : मुंबईसह उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्यासाठ्यात घट झाल्याने संपूर्ण शहरात 10 टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत बहुतांश ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. पण रविवारपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

सप्टेंबरपर्यंतच्या पाण्याची चिंता मिटली

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग यांसह कोकण किनारपट्टीवर रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुंबईत सोमवारी 71 हजार 147 दशलक्ष लीटर पाणीसाठा नोंदवण्यात आला. मुंबईतील सातही धरणात एकूण 20.48 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या पाणीसाठ्याची चिंता मिटल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

धरणक्षेत्रात दमदार पाऊस

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणक्षेत्रात सातत्याने पाऊस सुरु आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या सातही धरणांमध्ये 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. यातून रोज 3 हजार दशलक्ष पाणीपुरववठा केला जातो. गेल्या दोन दिवसांपासून या धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

गेल्या 24 तासात विहार धरणक्षेत्रात 364 मिमी आणि तुळशी धरणक्षेत्रात 254 मिमी पाऊस पडला. मुंबईतील पवई तलावही काल ओव्हरफ्लो झाला. पण या धरणातील पाणी औद्योगिक वापरासाठी वापरले जातो. तर मोडक सागर धरणात 35.85 टक्के पाणीसाठा आहे. तानसा धरणात 40.61 टक्के, मध्य वैतरणा धरणात 19.51 टक्के, भातसा धरणात 16.13 टक्के पाणीसाठा, विहार धरणात 31.74 टक्के, तुळशी धरणात 45.51 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांची सप्टेंबरपर्यंतची पाण्याची चिंता मिटल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मागील तीन दिवसात जवळपास १० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठी 20.48 टक्के इतका शिल्लक आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;