अमरावतीत युती धर्म पाळला गेला नाही?; फडणवीसांच्या भेटीनंतर नवनीत राणा म्हणाल्या, याची आयुष्यभर खंत…

अमरावतीत युती धर्म पाळला गेला नाही?; फडणवीसांच्या भेटीनंतर नवनीत राणा म्हणाल्या, याची आयुष्यभर खंत…

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा दारूण पराभव झाला. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. अमरावतीत महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं. मी त्याच्यावर काहीच भाष्य करणार नाही. माझे जे नेते आहेत ते त्याच्यावर भाष्य करतील. मी माझं कर्तव्य इमानदारीने पार पाडलं. मी नरेंद्र मोदीजींना अमरावतीमधून जागा देऊ शकली नाही, ती आयुष्यभर खंत माझ्या मनात राहणार आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा?

लोकसभा झाल्यानंतर आम्ही भेटलो नव्हतो. कशाप्रकारे निवडणूक झाल्या त्या संदर्भात बोलणं झालं. आमची भेट झाली नव्हती म्हणून भेटायला आलो. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. मला असं वाटतं मी भाजपची कार्यकर्ता आहे. माझं कर्तव्य आहे की निवडणुकीत काय झालं ते माझ्या नेत्याला सांगणं. इलेक्शनमध्ये कश्यामुळे माझ्या जनतेने मला अमरावतीमध्ये थांबवलं, ते त्यांना सांगणं मला खूप आवश्यक होतं. कुठे काय झालं माझ्याकडून काय चूक झाली. 2024 मध्ये मला माझ्या जनतेने थांबवलं. या सर्व गोष्टींवर चर्चा झाली. देवेंद्र फडवणीस माझे नेते आहेत. त्यांच्यासोबत भेटून बरं वाटलं. निवडणुकीनंतर 23 दिवसांनी मी त्यांना भेटले, असं नवनीत राणा म्हणाल्या.

बच्चू कडू यांच्याबाबत काय म्हणाल्या?

लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेवर नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मला असं वाटतंय मी कोणावर काही बोलणार नाही. मी माझं काम जनतेसाठी करते कोणत्या नेत्यासाठी करत नाही. माझ्या जिल्ह्यामध्ये जे काही घडलं माझं इलेक्शन मी लोकांच्या भरोशावर लढली. मी दुसऱ्या कोणाच्या भरोशावर निवडणूक लढली नाही. माझे नेते अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी माझ्यासोबत होते. ते सर्व जनतेला माहिती आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.

मी भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. पुढची जी काम करण्याची पद्धत असेल आणि विधानसभा मध्ये कसं काम करायचं आहे. या सर्व गोष्टींची चर्चा झाली. पार्टीचा जेव्हा पट्टा गळ्यात घातला त्याच्यासोबत नक्कीच मी इमानदार राहणार आहे, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;