पुन्हा NDA सोबत जायचं का? उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना प्रश्न

पुन्हा NDA सोबत जायचं का? उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना प्रश्न

शिवसेनेचा आज 58 वर्धापन दिवस आहे. या निमित्ताने ठाकरे गटाचा आज मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी धडाकेबाज भाषण केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला आपल्या पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा एनडीएसोबत जायचं का? असा उपरोधिक प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. “माझी परिस्थिती ही शेवटचा जो बोलतो, बॅटिंग करायची अशी आहे. मग बॉल कसा मारायचा. मारायचा छकडा नाही तर लकडा. पण लकडा कधी मारणार नाही. छकडाच मारेल. माझं कौतुक केलं आहे. माझ्यामुळे यश मिळालं असं तुम्ही म्हटलं. पण यशाचे मानकरी मी नाही,. तुम्ही आहात. आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास असेल तर जगात कुठेही जा मरण नाही, असं शिवसेनाप्रमुख म्हणायचे. पण आत्मविश्वास आणि अहंकार यात फरक आहे. मोदींमध्ये अहंकार आहे. भाजपला तडाखा बसला आहे. तडाखा बसल्यावर बाजूच्या गल्लीत कसं जायचं विषयांतर कसं जायचं हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यावर उद्धव ठाकरे एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा केली. जायचं? ज्या नालायकाने आपली शिवसेना फोडली. त्या नालायकांसोबत जायचं?”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.

“तुम्ही तुमचं बघाना. आमचं काय बघता. तुमची फाटली. माझी पंचाईत काय होते. घराणेशाही म्हटल्यावर घराची भाषा येते. तुम्ही माझ्यावर सभ्यतेचा शिक्का मारला. त्यामुळे समानार्थी शब्द शोधतो. फाटली या शब्दाला समानार्थी शब्द मिळत नाही. फाटले ते फाटले. भुजबळ शिवसेनेत येणार अशी पुडी सोडली. तुमच्याशी भुजबळ बोलले का. माझ्याशी बोलले का . मी त्यांच्याशी बोललो का, मग कशाला उचापती करता?”, असे सवाल उद्धव ठाकरेंनी केले.

‘हे सरकार चालेल असं वाटत नाही’

“मध्यावधी निवडणूक लागली तर आपले शिलेदार खासदार होईल. हे सरकार चालेल असं वाटत नाही. चालू नये असंच वाटतं. सरकार चालेल का पडेल का नाही. पडलेच पाहिजे. पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजे. पडलं तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापनक करू”, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.

“शिवसेनेला मुस्लिम मते मिळाली. सर्व देशभक्तांची मते मिळाली. सर्व देशभक्तांची मते मिळाली आहे. आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडल्याचा प्रचार. ते डोमकावळे तिकडे बसलेत. डोमकावळे म्हटल्यावर पिंडदान आलं. त्यांची कावकाव सुरू आहे. मी हिंदुत्व सोडलं नाही. देशभक्तांनी संविधान आणि देश वाचवण्यासाठी मला देशभक्तांनी मतदान केलंय. मी हिंदुत्व सोडलंय मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं वाटत असेल तर मोदींनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं असा दावा आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“काही क्षण असे येतात की भावना व्यक्त करणं कठिण होतं. लोकसभा निवडणुकीनंतर आपला शिवसेनेचा हा पहिला कार्यक्रम आहे. गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीची पीसी झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सर्वच होते. ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला मतदान केलं आशीर्वाद दिलं. त्यात दलित मुस्लिम, बौद्ध ख्रिश्चन आले शीखही आले. सर्वांना धन्यवाद देतो”, अशीदेखील भावना उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;