अपात्र आमदार मतदान करूच कसे शकतात? उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगालाच घेरलं

अपात्र आमदार मतदान करूच कसे शकतात? उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगालाच घेरलं

लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हापासून आपली लढाई सुरु झाली आहे. अजूनही ही लढाई सुरूच आहे. आता आपण मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक लढतोय. या जागा आपल्या हव्याच. त्या मला जिंकून पाहिजेत. नाशिक शिक्षक मतदारसंघही मला जिंकून पाहिजे. दोन्ही विजय मला हवे आहेत. जी लढाई सुरु झाली आहे ती सुरूच रहाणार आहे. आता थांबायचे नाही. शेवटचा विजय मिळेपर्यंत थांबता येणार नाही. 11 विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत. त्याची निवडणूक होणार आहे. आमदारांच्या मतांवर ही निवडणूक होत आहे. पण, ज्याच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते आमदार निवडणुकीत मतदान कसे करू शकतात? निवडणूक प्रक्रिया सुरु केलीच कशी? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केला.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक सुरू झाली आहे. विधानसभेतील आमदार ते 11 आमदार निवडून देणार आहे. पण, गद्दार आमदारांचे प्रकरण अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे असे असताना ही निवडणूक होऊच कशी शकते. आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना निवडणूक कशी होऊ शकते? आता म्हणतील की निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पण, ही प्रक्रिया सुरूच कशी झाली. अपात्र आमदार, गद्दार आमदार मतदान करूच कसे शकतात असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

आमदार अपात्रतेचे प्रकरण अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. शिवसेनेचा निर्णया व्हायचा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्णय बाकी आहे. त्यामुळे कोर्टाला विनंती आहे की आणखी किती वेळ घेणार आहात? ते 40 आमदार अपात्र झाले तर निवडणूक होऊ शकेल का? जनतेच्या न्यायालयात आम्ही जिंकलो आहोत. ते जनतेने दाखवून दिले आहे. आता तुम्ही दाखविणार आहात की नाही? सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की किती अंत बघणार आहात? न्याय मिळाला पाहिजे. पण, त्याला विलंब लागत असेल तर कसे चालेल. न्याय मेला तर कसे होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतात जाऊ द्या ना घरी. आता वाजवले की बारा. वाजले की बारा. तिकडचे ते म्हणतात नाही और सत्यानाश करो. काही झालं तर जबाबदारी घ्यायची ताकद नाही असे सरकार चालले आहे. पदवीधर आणि शिक्षक आपण लढत आहोत. आपल्या विजय पाहिजे. मुंबईत आणि नाशिकमध्ये. लढाई लढायची आहे. लढाई सुरू झाली आहे. ही लढाई वैयक्तिक नाही. ही लोकशाहीची आणि संविधानाची, न्याय्याची लढाई आहे. ती जिंकायलाच हवी असे ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;