मोठा भाऊ कोण? शिंदे गटातच मतभेद; संजय निरुपम यांचा पक्षनेत्यांना घरचा आहेर काय?

मोठा भाऊ कोण? शिंदे गटातच मतभेद; संजय निरुपम यांचा पक्षनेत्यांना घरचा आहेर काय?

महायुतीत मोठा भाऊ आणि छोटा कोण? यावरून वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि शंभुराज देसाई यांनी आपणच मोठा भाऊ असल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीतील स्ट्राईक रेटचा हवालाही दिला आहे. त्यामुळे मोठा भाऊ, छोटा भाऊ ही चर्चा रंगलेली असतानाच आता शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी एक वेगळंच विधान करून नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. निरुपम यांनी भाजपच मोठा भाऊ असल्याचं सांगत पक्षातील नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.

भाजप महायुतीत मोठा भाऊ आहे. भाजप ही मोठी पार्टी आहे. त्यात शंका नाही. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. ठिक आहे. पण भाजप हा राज्यात आणि देशात मोठा पक्ष आहे, असं सांगतानाच भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत हे वास्तव आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो. पुढेही लढू. फडणवीस यांचंही तसंच विधान आलं आहे, असं संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं.

आदित्य ठाकरे माफी मागा

वायव्य मुंबईत मोबाईलवरून ईव्हीएम अनलॉक केल्याची बातमी एका वृत्तपत्राने दिली होती. त्यावरून वादळ उठलं होतं. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं होतं. निवडणूक आयोगालाही जाब विचारला होता. मात्र, ती बातमी खोटी असल्याचं वृत्त आज या वृत्तपत्राने दिल्यानंतर संजय निरुपम चांगलेच आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. ईव्हीएण हॅक करूनच वायकर यांचा विजय झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. आता या वृत्तपत्राने चुकीची बातमी दिल्याबद्दल माफी मागितली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनीही माफी मागितली पाहिजे, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.

माफी दिलीच जाऊ शकत नाही

ईव्हीएमचा मुद्दा हा संवेदनशील मुद्दा आहे. भारताची लोकशाही परंपरा समृद्ध आहे. निवडणूक आयोग 60 ते 65 कोटी मतदारांना एकत्र करून, दीड महिना प्रचार करून शांततेने निवडणूक पार पाडतो. अशा निवडणूक आयोगाचं कौतुक करण्याऐवजी विरोधकांनी एका खोट्या बातमीवरून निवडणूक आयोगाला बदनाम केलं आहे. त्यासाठी विरोधकांना माफी दिली जाऊ शकत नाही. त्यांनी स्वत: पुढे येऊन माफी मागावी, अशी मागणीही निरुपम यांनी केली आहे.

मातोश्री खोटं बोलण्याचा कारखाना

मातोश्रीत खोटं बोलण्याचा कारखाना आहे. उद्धव ठाकरेंनी बनवलेली मातोश्री-2 ही घोटाळ्यातून बनली आहे. ती कशी बनली यावर कधी तरी बोलेल. मातोश्रीतून रोज एक खोटा विषय तयार केला जातो. आणि संजय राऊत तो लोकांपुढे मांडत असतात. लोकांमध्ये दुष्प्रचार सुरू केला जातो. तो आता बंद झाला पाहिजे. लोकांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. आम्ही कुठे चुकलो तर आम्हाला चूक दाखवणं हे विरोधकांचं काम आहे. पण विनाकारण सरकारला बदनाम करू नये. संजय राऊत रोज खोटं बोलत आहेत. त्याबद्दल त्यांना राज्यातील जनता माफ करणार नाही, असं ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;