भाजपने कोणकोणते नरेटिव्ह सेट केले?; उद्धव ठाकरे यांनी यादीच वाचली

भाजपने कोणकोणते नरेटिव्ह सेट केले?; उद्धव ठाकरे यांनी यादीच वाचली

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळवता आलं नाही. भाजपने विरोधकांवर संविधान बदलणार असल्याचं चुकीचा नरेटिव्ह सेट केल्याचा आरोप केला आणि याचाच फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसल्याचं सांगितंल. यावर महाविकास आघाडीमधील उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर देताना भाजपने कोणकोणते नरेटिव्ह सेट केले यांची वादी वाचून दाखवली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

इंडिया आघाडीला मते दिलं तर तुमची संपत्ती मुस्लिमांना देतील, हे नरेटिव्ह होतं. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या शेतातील म्हैस चोरून नेतील. यांचं सरकार आलं तर नळ कापून नेतील, मंगळसूत्र हे खरं नरेटिव्ह होतं. मी सत्तेत आल्यावर उद्योगधंदे वाढवेन, हा नरेटिव्ह नव्हता का. नकली संतान हे नरेटीव्ह नव्हतं का? असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

वोट जिहाद म्हणजे काय? मोदी म्हणतात त्यांचे बालपण मुस्लिम कुटुंबात गेलं. ईदमध्ये शेजारच्या मुस्लिम कुटुंबाच्या घरात ताजिया खायचे. त्या खालेल्या मीठाला ते जागले की नाही. मोदींनी सांगावं त्या मिठाला जागले की नाही. व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये मीठ टाकतात. तेही जेवण ते जेवले की नाही ते सांगावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी 22 जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो. 23 जानेवारी रोजी नाशिकमध्ये म्हटलं भाजप मुक्त राम पाहिजे. अयोध्येत आणि नाशिकमध्ये भाजपमुक्त राम झाला आहे. जिथे जिथे राम आहे. तिथे भाजपचा पराभव झालाय. भाजपमुक्त राम झाला आहे. त्यांना समजायला पाहिजे होतं. संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिलं होतं. कसंबसं त्यांचं पंतप्रधानपद वाचलं. किती दिवस सरकार राहील सांगता येत नाही. गुजरातबाबत चालुगिरी करायला लागले, तर त्यांच्या मूळ राज्यातच त्यांना सुरुंग लागेल. नरेटिव्ह म्हणता, ते एका बाजूला आहे. पण यांच्यात खरेपणा नाही. यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता. तो उडाला आहे. आता पुढील निवडणुकीत देशाचं चित्र अधिक चांगलं राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;