Manoj Jarange : अखेर सरकार बॅकफूटवर, मनोज जरांगे यांची ती मागणी मान्य होणार?; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान काय?

Manoj Jarange : अखेर सरकार बॅकफूटवर, मनोज जरांगे यांची ती मागणी मान्य होणार?; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान काय?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मराठा आंदोलनाने जबरी हिसका दाखवला. लोकसभेत महाविकास आघाडीचा धुवा उडविण्याचे महायुतीचे मनसुबे हवेतच राहिले. महायुतीलाच मराठा आंदोलनाने मोठे भगदाड पाडले. मराठवाड्यातील हक्काचे मतदारसंघ पण भाजपला राखता आला नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहेत. पाच दिवस उलटूनही त्यांनी उपचारांना नकारघंटा दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. ते आता ताकही फुंकून पित आहेत.

गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य?

मनोज जरांगे पाटील हे पु्न्हा उपोषणाला बसले आहेत. त्यावर देवेद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे त्याबाबत सरकार गंभीर असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे. मागच्या काळात आम्ही त्यांना केसेस परत घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर प्रक्रिया सुरू आहे. त्यांची जी मागणी आहे त्याबाबत देखील सरकारने पहिले नोटिफिकेशन जारी केलेले आहे.त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. याप्रकरणात सरकार सकारात्मक असल्याचे मत त्यांनी मांडले.

ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय नाही

मी ओबीसी नेत्यांशी चर्चा करत आहे. छगन भुजबळ यांच्याशी देखील चर्चा करून मी त्यांना समजावून सांगणार आहे. ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना सर्टिफिकेट देता येतं. सर्वोच्च न्यायालयाने जे निकष ठरवून दिलेत त्यात बसणारच नोटिफिकेशन काढण्यात आले. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. या प्रश्नी मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

जरांगे पाटील यांना फडणवीस यांचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं पाहिजे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आरक्षणाबाबत सरकार नेहमीच सकारात्मक राहिले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यापूर्वी आंदोलनादरम्यान आणि आताच्या उपोषणापूर्वी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. ते काड्या करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकार आता मराठा आंदोलन कसे हाताळते याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;