भाजपने शिवसेनेवर अन्याय केला, आणखी एक मंत्रिपद…; शिंदे गटाच्या नेत्याकडून जाहीर नाराजी व्यक्त

भाजपने शिवसेनेवर अन्याय केला, आणखी एक मंत्रिपद…; शिंदे गटाच्या नेत्याकडून जाहीर नाराजी व्यक्त

एनडीएचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे. काल संध्याकाळी नरेंद्र मोदी यांच्यासह 72 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी राज्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नेत्यांमध्ये मात्र नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना श्रीरंग बारणे यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपने शिवसेनेवर अन्याय केला. शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं, असं श्रीरंग बारणे म्हणाले.

मंत्रिपदावर बारणे काय म्हणाले?

शिवसेना हा महायुतीचा खूप जुना घटक पक्ष आहे. काही लोक महायुतीतून बाहेर पडले नंतर पुन्हा युतीत आले परंतू शिवसेना हा महायुतीतील जुना आणि महत्वाचा घटक पक्ष आहे. चिराग पासवान यांनी बिहार लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढली होती. ते आता पुन्हा एकदा महायुतीत आले आहेत. लोकसभेच्या पाच जागा त्यांनी लढवल्या आणि सर्व जागा जिंकल्या. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. शिवसेनेला मात्र राज्यमंत्रिपद देण्यात आलं, असं श्रीरंग बारणे म्हणाले.

“प्रतापराव जाधव हे चार टर्म खासदार…”

कुमार स्वामी यांचे दोन खासदार निवडून आले. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. जीतन राम मांझी हे एकटेच निवडून आले आहेत. तरी त्यांनी कॅबिनेटमंत्रिपद देण्यात आलं. परंतू शिवसेना पक्षाला 34 व्या स्थानी शपथ घ्यावी लागली आणि राज्यमंत्रिपदी समाधान मानावं लागलंमी तीन टर्म खासदार राहिलेलो आहे. प्रतापराव जाधव हे चार टर्म खासदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही, असं बारणेंनी म्हटलं.

एनडीए सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानंतर आता अजित पवार गटाने ही अन्याय झाल्याची खदखद बोलून दाखवली आहे. सरकार स्थापन होऊन चोवीस तास उलटायच्या आतच मंत्री पदावरून नाराजीनाट्य सुरू झालेलं आहे. अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी खदखद व्यक्त केली आहे. इतर राज्यातील घटक पक्षाच्या तुलनेत महाराष्ट्रातील घटक पक्षावर अन्याय झालाय, असं म्हणत बनसोडेंनी नाराजी व्यक्त केली.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;