राष्ट्रवादीत घमासान: अजित पवार गटातून का कोणालाही मंत्रिपदासाठी फोन नाही, पडद्यामागे नेमके काय घडले?

राष्ट्रवादीत घमासान: अजित पवार गटातून का कोणालाही मंत्रिपदासाठी फोन नाही, पडद्यामागे नेमके काय घडले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळास आज सुरुवात होणार आहे. मोदी सरकार 3.0 चा शपथविधी समारंभ संध्याकाळी होत आहे. या वेळी करण्यात येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वच पक्षांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून अद्याप कोणालाही फोन आला नाही. कोणाचेही नाव समोर आलेले नाही. त्याचे कारण समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले नाराजी नाट्य त्यासाठी कारणीभूत आहे. यामुळे आधी तुमच्या पक्षात असलेली नाराजी दूर करा, असे भाजप हायकंमाडने त्यांना सांगितले आहे.

काय सुरु आहे राष्ट्रवादीमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन जण खासदार आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेतील खासदार आहेत तर सुनिल तटकरे लोकसभेतून निवडून आले आहेत. या दोन्ही नेत्यांनी मंत्रीपदासाठी आपआपला दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु दोघांपैकी कोण? यासंदर्भात एकमत होऊ शकले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फोन गेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अजित पवार सकाळीच दाखल

प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यात सुरु असलेल्या वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची दिल्लीत तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी दीड तास बैठक झाली. त्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी वाद मिटवावा, यासाठी चर्चा झाली. परंतु शेवटपर्यंत तोडगा निघाला नाही. त्यामुळे दीड तासाच्या बैठकीनंतर अजित पवार, देवेंद्र फडणवीस बैठकीतून बाहेर निघाले.

भाजप हायकंमाडच्या सूचना

मोदी 3.0 मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधी समारंभात प्रत्येक पक्षाला स्थान देण्याचा प्रयत्न होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद न मिटल्यामुळे पीएमओतून राष्ट्रवादीच्या कोणत्याही खासदार फोन गेला नाही. आधी तुमच्यातील वाद मिटवा, असे भाजप हायकंमाडने राष्ट्रवादीमधील नेत्यांना सांगितले आहे.

भुजबळ यांचे नाव चर्चेत

प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांना मंत्रीपदासाठी संधी द्या, अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गटाने ही मागणी केली आहे. छगन भुजबळ यांच्यामुळे ओबीसी चेहरा मंत्री झाल्यास पक्षाला फायदा होईल, असे कार्यकर्ते सांगत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभास महाराष्ट्रातून १४०० लोकांना समारंभासाठी बोलवले. एकूण आठ हजार जण या सोहळ्यासाठी येणार आहे. त्यात भारताच्या शेजारील राष्ट्रांचे प्रमुख येत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;