चुना लावणारा माणूस यशस्वी झाला… सदाभाऊ खोत यांचा निशाणा कुणावर?

चुना लावणारा माणूस यशस्वी झाला… सदाभाऊ खोत यांचा निशाणा कुणावर?

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने वातावरण दूषित करण्याचं काम केलं आहे. शरद पवार यांनी 60 वर्ष मराठा समाजाला चुना लावण्याचं काम केलं आहे. पण हा चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वी झाला ही गोष्ट निश्चितपणे नाकारून चालणार नाही. भविष्य काळात काही मुद्दे आम्हाला घ्यावे लागतील, असं सांगतानाच राज्यात सत्ता आली तर राज्यातील मराठा समाजाला ओबीसीत 10 टक्के आरक्षण देऊ हे शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना लिहून द्यावं, असं आव्हानच सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना दिलं आहे.

सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं आहे. लोकसभेतील पराभवानंतर महायुतीची बैठक झाली. या बैठकीला सदाभाऊ खोतही गेले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली आहे. महायुतीला ज्या कमी जागा मिळाल्या त्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. मला सरकारमधून मुक्त करावं असं फडणवीस म्हणाले असले तरी निवडणुकीची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे फडणवीस यांनी सरकारमध्ये राहिलं पाहिजे, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

विधासभेतही नेतृत्व करा

देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. येणाऱ्या विधानसभेत महायुतीचेही त्यांनी नेतृत्व केलं पाहिजे. आम्ही महायुतीसोबत कायम राहू, असं सदाभाऊ यांनी सांगितलं.

आमची भूमिका मांडणार

महायुतीतील सर्व घटक पक्षांनी निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलं आहे. आमच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भागात जाऊन सभा घेतल्या आहेत. विधानसभेला निश्चितपणाने आमची भूमिका तिन्ही मोठ्या पक्षांसमोर मांडणार आहोत, असं ते म्हणाले.

इंडिया आघाडी लुटारूंची टोळी

देशाला विकासाच्या वाटेवर फक्त मोदीच नेऊ शकतात. मोदींचं नेतृत्व सक्षम आहे. संपूर्ण देश आणि जग मोदींकडे आशेने बघत आहे. इंडिया आघाडी ही लुटारुंची टोळी आहे. ही टोळीवाल्यांची आघाडी आहे. म्हणून आम्ही इस्लापूरला एक मेळावा घेतला. आमची लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. देशातील कष्टकरी जनतेला घेऊन आम्ही लढत आहोत. या निवडणुकीत अनेक बागुलबुवा निर्माण केले गेले आणि त्याचाही परिणाम या निवडणुकी झाला, असा दावा त्यांनी केला.

जरांगे फॅक्टरचा तोटा

महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि त्यांचा सगळा कंपू हे आता जरांगेला कामाला लावणार आहेत. मनोज जरांगे यांचं आंदोलन आता विधानसभा निवडणुकीपर्यंत चालेल. आरक्षणाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी शरद पवार करत आहेत, असं सांगतानाच या निवडणुकीत आम्हाला जरांगे फॅक्टरचाही तोटा झाला आहे, असं ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;