ब्रेकिंग न्यूजने देश चालणार नाही, मोदींचा अलर्ट; एनडीएचाही सांगितला अर्थ

ब्रेकिंग न्यूजने देश चालणार नाही, मोदींचा अलर्ट; एनडीएचाही सांगितला अर्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित खासदारांना अलर्ट केलं आहे. तुम्ही विकासाची कामे करा. चांगली कामे करा. देशाची प्रगती करा. केवळ ब्रेकिंग न्यूजने देश चालणार नाही, असा सावधानतेचा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. तर देशातील जनतेने एनडीएवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे विरोधक देश भावनेने सभागृहात येतील. चांगली डिबेट करतील. देशाच्या विकासात मदत करतील. विरोधक हे आमचे विरोधक असू शकतात. पण देशाचे नाही. तेही या देशाचा एक घटक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

संसदेच्या कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये एनडीएची बैठक पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी मोदींनी खासदारांना संबोधित केलं. खासदारांना संबोधित करताना मोदींना निवडणूक निकालाचं विश्लेषण करतानाच देशाच्या विकासाचा रोड मॅपही मांडला. आपण 10 वर्षात जो विकास केला तो फक्त ट्रेलर आहे. ते माझं निवडणुकीचं भाषण नव्हतं. आपल्याला वेगाने विकास करायचा आहे. आपणच आपलं रेकॉर्ड तोडावं असं जनतेला वाटत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

वन पॉइंट अजेंडा नाकारला

नरेंद्र मोदी यांनी यावेळी एनडीएचा अर्थही सांगितला. एनडीए म्हणजे न्यू इंडिया, डेव्हल्प इंडिया, ॲस्पिरेशनल इंडिया. हेच स्वप्न आणि संकल्प पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्याकडे रोड मॅप आहे. आपण नेहमी करप्शन फ्री सरकार दिलं आहे. संधी मिळताच आपण काम केलं आहे. काँग्रेस नेतृत्वातील यूपीएने नाव आता बदललं आहे. पण त्यांची ओळख घोटाळ्यांची आहे. नाव बदलल्यानंतरही देश त्यांच्या घोटाळ्याला विसरला नाही. त्यांना नाकारलं आहे. इंडिया आघाडीने एका व्यक्तीचा विरोध करण्यासाठी वन पॉइंट अजेंडा राबवला. त्यामुळे देशातील जनतेने त्यांना पुन्हा विरोधात बसवलं आहे. एनडीए विकसीत भारताची संकल्पना घेऊन निवडणुकीला सामोरे गेला होता, असं मोदी म्हणाले.

तो चांगला संकेत

देशातील जनतेचा एनडीएवर अतुट विश्वास आणि भरवसा आहे. त्यामुळे देशवासियांच्या अपेक्षा वाढणार हे स्वाभाविक आहे. मी ही गोष्ट चांगला संकेत मानतो. मी आधीच सांगितलं होतं की, मागच्या दहा वर्षातील काम हे फक्त एक ट्रेलर आहे. ही माझी कमिटमेंट आहे. आपल्याला अजून वेगाने आणि विश्वासाने पुढे जायचं आहे. देशाच्या आकांक्षापूर्ण करण्यासाठी एक क्षणही विलंब करणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं.

10 वर्षात 100चा आकडा गाठला नाही

यावेळी मोदींनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेसने गेल्या दहा वर्षात 100 चा आकडा गाठला नाही. गेल्या तीन निवडणुकीतील काँग्रेसची आकडेवारी एकत्र केली तरी त्यापेक्षा जास्त सीट आपण जिंकल्या आहेत, असा चिमटाच त्यांनी काढला. आम्हाला विजय पचवता येतो. विजयाचा उन्माद करायचा नाही आणि पराभूतांचा उपहास करायचा नाही ही आपली संस्कृती आहे. आपण हरलो नव्हतो आणि हरलो नाही, असंही त्यांनी ठासून सांगितलं

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;