PM Narendra Modi Speech : ‘EVM जिवंत आहे की मेलं’ काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

PM Narendra Modi Speech : ‘EVM जिवंत आहे की मेलं’ काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजप्राप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय नेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी उपस्थित खासदारांना मार्गदर्शन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी EVM वरुन इंडिया आघाडीवर निशाणा साधला. “4 जूनला निकाल येत होते, तेव्हा मी कामात व्यस्त होतो. त्यावेळी मी कोणाला तरी विचारलं, आकडे वैगेरे ठीक आहेत. पण मला सांग, EVM जिवंत आहे की मेलं. कारण या लोकांनी आधीच ठरवलेलं भारताच्या लोकशाहीवरचा विश्वास उडाला पाहिजे, म्हणून ईव्हीएमला शिव्या घातल होते. पण 4 जूनच्या संध्याकाळी त्यांना टाळी लागली. EVM ने त्यांना शांत केलं” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“ही भारताच्या लोकशाहीची, निष्पक्षतेची, निवडणूक आयोगाीची ताकद आहे. मी आशा करतो आता पुढची पाच वर्ष EVM चा आवाज ऐकू येणार नाही. 2029 मध्ये पुन्हा EVM घेऊन येतील. निवडणूक काळात मी पाहिलं, प्रत्येक तिसऱ्यादिवशी निवडणूक आयोगाच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. हे सर्व करणारी एकच टोळी होती. हे सर्व तेच लोक होते, ज्यांचा लोकशाहीवर अविश्वास आहे” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

‘ताकदीचा मोठा हिस्सा तिथे खर्च झाला’

“सुप्रीम कोर्टाचा वापर करुन अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाच्या ताकदीचा मोठा हिस्सा तिथे खर्च झाला. बरीच निराशा घेऊन ते मैदानात उतरले होते. निवडणूक आयोगावर हल्ला केला. निकाल काहीही लागो, भारताला बदनाम करणं हे त्यांच षडयंत्र होतं. देश त्यांना कधीही माफ करणार नाही” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.


‘इंडिया आघाडीवाले मागच्या शतकातले’

“इंडिया आघाडीचे नेते ईव्हीएमला विरोध करतात. त्यांच्यासाठी टेक्नोलॉजीच महत्त्व नाही. ते टेक्नोलॉजी स्वीकारायला तयार नाहीत. इंडिया आघाडीवाले मागच्या शतकातले लोक आहेत. प्रगती, आधुनिकता आणि टेक्नोलॉजीला त्यांचा विरोध आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;