निवडून आल्यानंतर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे रडले; असं काय घडलं?

निवडून आल्यानंतर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे रडले; असं काय घडलं?

अमरावतीत भाजपाचा चर्चेतील चेहरा नवनीत राणा यांचा पराभव करुन निवडून आलेले कॉंग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे हे त्यांच्या विजयानंतर भावूक झाले आहेत. आपल्या आईबद्दल बोलताना त्यांचे अश्रु अनावर झाले. त्यांनी आपल्या राजकारणाचा प्रवास अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून सुरु केला ते आज थेट खासदार म्हणून समस्या मांडण्यासाठी ते दिल्लीतील संसदेत पोहचले आहे. या मतदार संघातील निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती.

बळवंत बनसोडे यांनी विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे. आपल्या आईबद्दल बोलताना त्यांना भावना अनावर झाल्या. त्यांची मातेने माझ्या मुलावर जिल्ह्यातील लोकांनी विश्वास टाकला त्याबद्दल मी जनतेचे आभार मानते असे म्हटले तेव्हा ते सद्गदीत झाले. लहानपणापासून त्याला समाजसेवेची आवड होती अशी प्रतिक्रीया त्यांच्या मातेने व्यक्त केली आहे. माझा मुलगा ग्रामपंचायत सदस्यपासून ते आज खासदार झाला याचा मला आनंद होत आहे. माझा मुलगा लोकांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देईल असाही विश्वास बळवंत वानखडे यांच्या मातेने व्यक्त केला. तर जिल्ह्यातील लोकांची सेवा आणि विकासाची काम ते करतील असा विश्वास त्यांच्या पत्नीने व्यक्त केला आहे.

नवनीत राणा यांना मी सल्ला देऊ शकत नाही

मी अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी लोकांची इच्छा होती. लोकांना नवनीत राणा यांचे नृत्य, गाणे आणि नाटक आवडत नव्हते. मी नवनीत राणा यांना सल्ला देऊ शकत नाही, असा सल्ला जनतेने त्यांना दिला आहे. त्याने माझ्या 50 कामा पैकी पाचही कामे केली नाहीत. मला अमरावतीतून निवडणूक लढवायची होती. परंतू पण अमित शहा आणि ज्येष्ठ नेत्यांनी आपल्याला सल्ला दिला येथून लढू नये. वरिष्ठ नेत्यांनी मला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिले आहे असे आनंदराव अडसुळ यांनी म्हटले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात झालेले नुकसान आणि पक्ष फोडणे आणि घर फोडणे यामुळे लोक संतप्त झाल्याने झाले आहे असेही आनंदराव अडसुळ यांनी म्हटले आहे. आनंदराव अडसुळ महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;