Lok Sabha Election Result 2024: सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे यांनी केला दावा, सांगितलं की, “दुपारनंतर…”

Lok Sabha Election Result 2024: सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे यांनी केला दावा, सांगितलं की, “दुपारनंतर…”

लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. सत्तेचा मार्ग दिसत असला तरी तिथपर्यंत पोहोचणं मित्रपक्षांशिवाय शक्य नाही. त्यामुळे आता भाजपाला मित्रपक्षांपुढे झुकावं लागणार आहे. असं असताना राज्यातही भाजपाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेच्या 23 जागांवरून थेट 9 जागांवर घसरण झालेली आहे. राज्यात सर्वाधिक जागा या काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्या खालोखाल उद्धव ठाकरे गटाला यश मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आपलं मत व्यक्त केलं. तसेच केंद्रात सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबतही त्यांनी आपलं थेट मत व्यक्त केला आहे. सत्ता स्थापनेसाठी नक्कीच दावा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.”सत्ता स्थापनेसाठी दावा करायला पाहीजे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी दुपारनंतर जाईन.आज मला मुंबईतील खासदार भेटायला आले आहेत. उद्या मुंबई बाहेरचे खासदार भेटायला येणार आहेत. सर्वात आधी संजय राऊत तिथे जातील आणि त्यांच्यासोबत खासदार अनिल देसाई असतील. मी संध्याकाळच्या वेळेला मी तिथे पोहोचेन.”असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

” पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल याच्याबाबत चर्चा होईल. इंडिया आघाडी म्हणून आम्ही तयारी केली. तेव्हा आमच्यापैकी कोणीही आम्ही पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहे असं सांगितलं नाही. देशातील लोकशाही वाचवली पाहीजे, संविधान वाचवलं पाहीजे आणि हुकूमशाहीपासून देशाला वाचवलं पाहीजे, ही आमची भावना होती. उद्या पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवला जाईल आणि त्याला आम्ही सर्व समर्थन देऊ.”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“सर्व छोटे मोठे पक्ष आम्ही एकत्र येऊ. भाजपाने त्या सर्वांना त्रास दिला आहे. चंद्रबाबू नायडू यांना सुद्धा भाजपाने कमी त्रा दिला नव्हता..नितीश कुमार यांना काय कमी त्रास दिला. पुन्हा हा त्रास हवा का हा देखील प्रश्न आहे. एकदा हे गेलेलं सरकार जे उंबरठ्यावर त्यांना घालवण्यासाठी आणि सर्वच जण एकत्र येतील. त्यामुळे नक्कीच ते भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येतील.”, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.उद्धव ठाकरे यांनी सांगलीत महाआघाडीचा धर्म पाळला गेला नसल्याचा आरोपही केला आहे. विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती. तसेच चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरे गटाकडून रिंगणात उतरवण्यात आलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;