लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रनौत यांची पहिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रनौत यांची पहिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रनौत यांची पहिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीतच विजय मिळवला आहे. भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. मंडी मतदार संघात कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते. कंगना रनौत यांनी मंडी लोकसभा जागेवर जोरदार प्रचार केला आणि विजय मिळवला. अभिनेत्रीची ही पहिलीच निवडणूक असून कंगनाने पहिली निवडणूक जिंकली आहे.

पहिल्यांदा निवडूण आल्यामुळे कंगना यांनी पंतप्रधान मोदी आणि जनतेचे आभार मानले आहेत. कंगना म्हणाल्या, ‘आमचे नेता नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणूक लढवली आहे. मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. मंडीचं भाविष्य आता उज्वल असणार आहे…. असं म्हणत कंगना यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत.’

सांगायचं झालं तर, कंगना यांनी विक्रमादित्य सिंह यांच्यावर 73 हजार मतांनी मात केली आहे. कंगना रनौत यांना 503790 जनतेनं मत दिलं. विक्रमादित्य सिंह यांना 430534 मतं मिळाली आहेत. कंगना यांच्या विजयानंतर मंडी मतदार संघात आनंदाचं वातावरण आहे.

सोशल मीडियावर कंगना यांनी आईसोबत काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये कंगना आईचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, कंगना यांनी आता स्वतःचा मोर्चा राजकारणाकडे वळवळा आहे. सध्या सर्वत्र कंगन यांच्या विजयाच्या चर्चा रंगल्या आहे.

आता बॉलिवूडला निरोप देणार कंगना रनौत?

कंगना रनौत यांच्या विजयानंतर अभिनेत्री बॉलिवूड सोडणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण निवडणूक प्रचारादरम्यान कंगना यांनी निवडणूक जिंकली तर बॉलिवूड सोडेन, असं वक्तव्य केलं होते. आता कंगना रनौत यांची पुढील वाटचाल आणि घोषणा काय असेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;