देशात इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं का? पाहा आणखी किती जागा हव्यात

देशात इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं का? पाहा आणखी किती जागा हव्यात

केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला स्वबळावर बहुमत मिळत नसल्याचे पाहून आता विरोधी पक्षाचे नेतेही सक्रिय झाले आहे. सरकार स्थापनेसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधी पक्षातील मोठे नेते शरद पवार यांनी दोन मोठ्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. शरद पवार यांनी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दल (बीजेडी) प्रमुख नवीन पटनायक यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही झाल्या असून दोन्ही ठिकाणी जनतेने सरकार बदलाच्या बाजूने कौल दिला आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना मोठा झटका बसला आहे, त्यांचा YSRCP पक्ष आंध्र प्रदेशातून सत्तेबाहेर गेला आहे. तर बीजेडी देखील ओडिशात सत्तेबाहेर आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंचा पक्ष टीडीपी सरकार स्थापन करत आहे, तर ओडिशात भाजपने बीजेडीकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. पत्रकार परिषदेत मात्र आपण कोणाशीही बोललो नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

एनडीएसोबत कोणते पक्ष

टीडीपीने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सोबत निवडणुका लढवल्या आहेत. तर बीजेडीने नेहमीच संसदेत एनडीएच्या नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. टीडीपी सत्तेवर येत आहे मात्र दुसरीकडे बीजेडीकडून सत्तेतून बाहेर जात आहे. टीडीपीने लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली आहे. आंध्र प्रदेशात त्यांना 16 जागा मिळाल्या आहेत तर त्याचा मित्रपक्ष भाजपला चार जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत बीजेडीला मात्र जोरदार झटका बसलाय. त्यांना फक्त एका जागेवर आघाडी मिळाली आहे.

बिहारमध्येही पेच वाढला

बिहारमध्येही राजकीय पेच वाढला आहे. नितीश कुमार यांना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. नितीश कुमार हे आधी इंडिया आघाडीचे भाग होते. पण निवडणुकीच्या आधी ते एनडीए सोबत आले. नितीश कुमार हे कधी कोणत्या पक्षासोबत जातील हे सांगता येत नाही. नितीशकुमार यांना सोबत आणण्यासाठी शरद पवारांनी त्यांना फोन केल्याची माहिती आहे. नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू देखील एनडीएचा एक भाग आहे. बिहारमध्ये जेडीयूला स्वबळावर 14 जागा मिळाल्या आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा TDP आणि नितीश कुमार यांचा JDU यांना एकत्र केले तर 16 + 14 म्हणजे 30 जागा होत आहेत. इंडिया आघाडीकडे या तीस जागा आल्यातर ते बहुमताजवळ पोहोचू शकतात.

सध्या भाजपला 240 जागा तर काँग्रेसला 100च्या जवळपासृ जागा मिळताना दिसत आहेत. एनडीएला सुमारे 300 जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला सुमारे 230 जागा मिळू शकतात. पण जर यात टीडीपी आणि जेडीयू यांच्या एकूण तीस जागा मिळाल्या तर हा आकडा २६० होऊ शकतो. त्यांना आणखी १२ जागांची गरज आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;