मोदी की गडकरी कोण आहे संघाची पहिली पसंत? पंतप्रधानपदाबाबत चर्चांना वेग

मोदी की गडकरी कोण आहे संघाची पहिली पसंत? पंतप्रधानपदाबाबत चर्चांना वेग

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपने बऱ्याच जागा गमावल्या आहेत. दुसरीकडे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून गडकरी सध्या आघाडीवर आहेत. ते सध्या 70 हजार मतांनी पुढे आहेत. नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे मैदानात आहेत. नागपुरातून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पण जर भाजपला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तर मग नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

सगळ्यांसोबत चांगले संबंध

नितीन गडकरी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. नागपूर येथे संघाचे मुख्यालय आहे. त्याच नागपूरचं नितीन गडकरी प्रतिनिधित्व करतात हा देखील एक योगायोगच आहे. यंदा नितीन गडकरी यांनी कोणतेही पोस्टर न लावता प्रचार केला. नितीन गडकरी हे भाजपचे असे नेते आहेत ज्यांच्या नावाला काही विरोधी पक्षही पाठिंबा देऊ शकतात. जर नितीन गडकरी पंतप्रधान होत असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील त्यांना पाठिंबा देऊ शकतो. निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी नितीन गडकरींच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. तिथे फडणवीसांनी योग्य तो पाठिंबा दिला नाही, असे राऊत म्हणाले होते. फडणवीसही नागपुरातून येतात. ते नागपूरचे आमदार आहेत.

गडकरी हॅट्ट्रिकच्या दिशेने

2014 मध्ये नितीन गडकरी यांनी काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांचा पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींनी महाराष्ट्र काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव केला. नितीन गडकरींनी 2.16 लाख मतांच्या फरकाने विजयी झाले. गडकरींसमोर आता सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याचे आव्हानच नाही, तर मताधिक्य वाढवण्याचेही आव्हान आहे. नितीन गडकरी निवडणुकीपूर्वी एका कार्यक्रमात म्हणाले की, काम करणाऱ्याचे नाव कमी आहे. त्यांनी अनेक वेळा विरोधकांच्या टाळ्या मिळवल्या आहेत.

गडकरींचे विरोधकांशीही चांगले संबंध

भाजपचे नितीन गडकरी यांचा समावेश त्या नेत्यांमध्ये होतो ज्यांचं कौतूक विरोधक देखील करतात. अनेक विरोधी पक्षनेत्यांनी नितीन गडकरी यांचे खुलेपणाने कौतुक केले आहे. नितीन गडकरी हे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. जर भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांनी कधीही अल्पमतातील सरकारचे नेतृत्व केले नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालात अपेक्षित संख्याबळ न मिळाल्याने आरएसएस चिंतन करणार आहे. आता फक्त आरएसएस सक्रिय झाले असे नाही तर शरद पवारही सक्रिय झाले आहे. त्यांनी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना फोन केल्याची देखील माहिती आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;