विजय वडेट्टीवार यांची मोठी घोषणा; निकालाआधीच उडवली खळबळ

विजय वडेट्टीवार यांची मोठी घोषणा; निकालाआधीच उडवली खळबळ

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागायला अजून काही तास उरले आहेत. देशाचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. भाजप येणार की काँग्रेसचं कमबॅक होणार? याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे. तर आपलं काय होणार? अशी धाकधूक अनेक उमेदवारांच्या मनात निर्माण झाली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजामुळे तर काही उमेदवारांची झोपच उडाली आहे. अशी सर्व धाकधूक सुरू असतानाच काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणनेने एकच खळबळ उडाली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधला. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आमचा पराभव होत असेल तर मी राजकीय संन्यास घेईल, अशी घोषणाच विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विदर्भच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद होता. काँग्रेसचं वारं वाहत होतं. महाराष्ट्रातील किमान 35 जागा आम्ही जिंकत आहोत, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

मोदींविरोधात चीड

गेल्या आठवड्यापासून अनेक प्रसार माध्यमं सत्ताधाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक्झिट पोलमध्ये एनडीएचे 350 ते 375 जागा दाखवत आहेत. पण देशात मोदी सरकार विरोधात चीड होती. नागरिकांमध्ये मोठी नाराजी आणि संताप होता. त्यामुळेच मतदारांनी यंदा काँग्रेसला साथ दिली आहे. म्हणूनच आणच्या जागा अधिक निवडून येतील, असं वडेट्टीवार म्हणाले.

त्यांच्यावर कारवाई केली का?

उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. पण निवडणूक आचारसंहिता असताना धार्मिक भाषणं करणाऱ्यांवर कारवाई झाली का? महाराष्ट्रात मतदान सुरू असताना बाजूच्या मतदारसंघात सभा घेतल्या, तो आचारसंहितेचा भंग झाला नाही का? त्यावर काही कारवाई केली का?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

तर दाल में कुछ काला है

देशाच्या सत्ता परिवर्तनासाठी काही तास शिल्लक बाकी आहेत. महाराष्ट्राचा निकाल स्पष्ट आहे. आम्ही 35 जागा जिंकत आहोत. एक्झिट पोल बोगस होते. सत्ताधाऱ्यांना खूश करण्यासाठीचे ते एक्झिट पोल आहेत. विदर्भात तर आमची लाट आहे. विदर्भातील 10 पैकी 10 जागा आम्ही जिंकत आहोत. विदर्भातील जनतेने सरकार विरोधात चिडून मतदान केलं आहे. सरकार विरोधात एवढं वातावरण असताना जर निकाल वेगळे लागले तर दाल में कुछ काला है असं समजावं, असं ते म्हणाले. इंडिया आघाडी देशात 295 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;