PM Narendra Modi : साधना करताना मनात, डोक्यात काय आलं? मोदींनी शब्दात उतरवला साधनेचा अनुभव
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक 2024 चा प्रचार संपल्यानंतर तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे ध्यानधारणेसाठी गेले होते. साधना करुन परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ब्लॉग लिहिला आहे. त्यात त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनुभवांचा उल्लेख केला आहे. कन्याकुमारीच्या तीन दिवसाच्या अध्यात्मिक यात्रेत वेगवेगळे अनुभव मिळाल्याच पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांना स्वत:मध्ये चैतन्य, ऊर्जेचा एक प्रवाह जाणवला. 24 च्या या निवडणुकीत सुखद योगायोगाच्या अनेक गोष्टी जुळून आल्या. “अमृतकाळातील या पहिल्या लोकसभा निवडणुकीत मी, 1857 च्या प्रथम स्वातंत्र्य संग्रामाच प्रेरणास्थळ मेरठमधून प्रचार अभियानाची सुरुवात केली. देशभर भ्रमंती करताना या निवडणुकीतील माझी शेवटची सभा पंजाबच्या होशियारपुरमध्ये झाली. संत रविदास यांची तपोभूमी, गुरुंची भूमी पंजाबमध्ये शेवटची सभेच सौभाग्य लाभण खूप खास आहे” असं पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
त्यानंतर मला कन्याकुमारी येथे भारत मातेच्या चरणी बसण्याची संधी मिळाली. “सुरुवातीला निवडणुकीचा कोलाहल मनात आणि डोक्यात सुरु होता. रॅली, रोड शो मध्ये दिसलेले असंख्य चेहरे माझ्या डोळ्यासमोर आले. माता-भगिनींकडून मिळालेलं प्रेम, आशिर्वाद, त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल विश्वास हे सगळं मला दिसत होतं. माझ्या डोळ्यात पाणी होतं. मी शुन्यात चाललेलो. साधनेमध्ये माझा प्रवेश सुरु झालेला” असं मोदींनी या ब्लॉगमध्ये म्हटलय.
“कन्याकुमारी में साधना से नये संकल्प”
आइए, तेज कदमों से चलें… मिलकर चलें, भारत को विकसित राष्ट्र बनाएं।
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी द्वारा 1 जून को कन्याकुमारी से दिल्ली लौटते समय लिखे गए विचार।
पूरा पढ़ें : https://t.co/N9l324uN4c#NewSankalp4Bharat pic.twitter.com/0vrP2RQao6
— BJP (@BJP4India) June 3, 2024
…आणि शब्द सगळे आपोआपच शुन्यात गेले
“काही क्षणात राजकीय वाद विवाद, वार-पलटवार, आरोपांचे स्वर आणि शब्द सगळे आपोआपच शुन्यात गेले. माझ्या मनात विरक्तीचा भाव आणखी तीव्र झाला. माझं मन बाह्य जगापासून पूर्णपणे अलिप्त झालं. इतक्य मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये अशी साधना कठीण असते. पण कन्याकुमारीची भूमी आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने हे सहजतेने शक्य झालं. खासदार म्हणून काशीत मतदान होत असताना ते सोडून इथे आलो होतो. मी ईश्वराचा आभारी आहे. मला जन्मापासून त्यांनी हे संस्कार दिले. मी हा सुद्धा विचार केला की, स्वामी विवेकानंद यांना त्या स्थानावर साधना करताना काय अनुभव आला असेल. माझ्या साधनेच्या काही भागात असे विचार येऊन गेले” असं मोदींनी ब्लॉगमध्ये लिहिलय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List