उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार, निवडणूक आयोग मोठी कारवाई करणार?

उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार, निवडणूक आयोग मोठी कारवाई करणार?

मतदानाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन उद्धव ठाकरे अडचणीत येताना दिसत आहेत. 20 मे रोजीची मतदान संपण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते. त्यावरुन भाजपच्या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगानं केद्रीय आयोगाला अहवाल दिला आहे. 20 तारखेला मतदान संपण्याच्या ठीक तासाभराआधी केलेल्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंवर केंद्रीय निवडणूक आयोग कारवाई करु शकते.

मतदान सुरु असतानाच पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर आरोप केले. त्यामुळं ठाकरेंच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भाजपच्या शेलारांनी केली होती. त्यासंदर्भात उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची पाहणी करुन त्यासंदर्भातला अहवाल राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे.

20 मे रोजी मुंबईसह महाराष्ट्रातल्या 13 जागांवर मतदान झालं. पण मुंबईत संथ गतीनं मतदान झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. काही ठिकाणी 3 ते 4 तास मतदानासाठी लागले. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी मतदान संपण्याच्या एक तासाआधीच पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेला होणाऱ्या मतदानाच्या ठिकाणीच, बिलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगावर ही त्यांनी टीका केली.

आता राज्य निवडणूक आयोगानं अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग अशा प्रकारात काय कारवाई करु शकते. या कायदेतज्ज्ञ सांगतात की, अशा प्रकारच्या प्रकरणामुळे निवडणूक आयोग चौकशी करु शकते. आचारसंहितेचा भंग झाला असेल तर त्यात निवडणूक आयोग लक्ष घालू शकते.

राज्य निवडणूक आयोगाच्या अहवालावर पुढची कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगाला करायची आहे. अर्थात उद्धव ठाकरेंना आपलं म्हणणं मांडण्यासाठी संधीही मिळेल. आता केंद्रीय निवडणूक आयोग काय भूमिका घेतं, हे पाहावं लागेल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;