मालगाडी घसरल्यामुळे विरार ते डहाणू लोकल ठप्प, ‘या’ गाड्याही झाल्या रद्द; सकाळीही प्रवाशांचे हाल कायम!

मालगाडी घसरल्यामुळे विरार ते डहाणू लोकल ठप्प, ‘या’ गाड्याही झाल्या रद्द;  सकाळीही प्रवाशांचे हाल कायम!

पालघर स्थानकाजवळ मालगाडी घसरून भीषण अपघात झाला आहे. या अपघाताला आता 15 तास उलटले असले तरीही वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. याचा परिणाम लोकल सेवेवेर देखील झाला असून विरार ते डहाणू या मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. रुळांवर पडलेले मालगाडीचे डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र ते पूर्णपणे हटवेपर्यंत लोकल सवा तसेच लांब पल्ल्यांट्या गाड्यांचे वेळापत्रकही विस्कळीत असून अनेक गाड्यांना उशीर होत आहे.

काल रात्रीपासूनच पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू असलेला गोंधळ आज सकाळी देखील कायम असून त्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत. कामावर निघालेले अनेक चाकरमानी, विद्यार्थी यांना मोठा फटका बसला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्याही १०-१२ तास उशिराने सुटत आहेत.

या मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीचे काही डबे काल संध्याकाळी रुळांवरून घसरले आणि एकच गोंधळ निर्माण झाला. पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी पोहचत असताना क्रॉसिंगलाच मालगाडीचे पाहिले चाक ट्रक वरून खाली घसरले. सर्वात पाठीमागील चाक ट्रेकवरून खाली घसरले असताना याचा फटका समोरच्या चाकांना बसून, त्यावर लोड आल्याने मध्यभागाचे 7 डब्बे हे रुळावरून खाली घसरले. ऐन गर्दीच्या वेळेस वाहतूक ठप्प झाल्याने काल प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आणि सकाळीही वाहतूक अजून सुरळीत न झाल्याने लोकांना आणखीनच मनस्ताप सहन करावा लागतोय. वाढत्या गर्दीमुळेही लोकांना त्रास होत आहे.

 

प्रवाशांनी मांडल्या व्यथा

आम्ही सकाळी साडेसहापासून स्टेशनवर उभे आहोत. आत्तापर्यंत एकही गाडी आलेली नाही. आम्हाला कॉलेजमध्ये 80% हजेरी लावणे बंधनकारक आहे, ती नाही लागली तर आम्हाला परीक्षेला बसू देण्यात येणार नाही, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कॉलेजला गेलंच पाहीजे, असं एका विद्यार्थ्याने सांगितलं.

आम्ही काल डहाणूवरून सौराष्ट्र एक्स्प्रेस पकडली, पण ती बोईसरच्या आधीच मध्येच थांबवण्यात आली. तब्बल अर्धा तास गाडी तशीच थांबली होती, अखेर आम्ही खाली उतरून बोईसर स्टेशनपर्यंत चालायला सुरूवात केली. पण तिथे गेल्यावरही आम्हाला रिक्षा, बस काहीच मिळेना. शेवटी कसेबसे सेपरेट रिक्षा करून, जास्तीचे पैसे भरन घरी पोहोचलो. आज सकाळी पण लौकर आलोय पालघरला, किती वेळ उभे आहोत, पण एकही ट्रेन, मले, काहीच गेली नाही. सगळे ताटकळत आहेत, एखादी ट्रेन येईल असे म्हणत तर आहेत, पण त्याचीही निश्चित वेळ सांगता येत नाही. कामावर कसं जायचं असाच प्रश्न आहे, असा अनुभव आणखी एका प्रवाशाने सांगितला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;