Prashant Kishor : ‘फक्त 30 ते 35 जागांसाठी भाजपाने…’, प्रशांत किशोर यांचा भाजपावर गंभीर आरोप

Prashant Kishor : ‘फक्त 30 ते 35 जागांसाठी भाजपाने…’, प्रशांत किशोर यांचा भाजपावर गंभीर आरोप

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. त्यावरुन सत्ताधाऱ्यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियावर जुंपली आहे. प्रशांत किशोर राजकीय व्यवस्थापनात कुशल मानले जातात. जनमानसाची नाडी ओळखण्याचा गुण त्यांच्याकडे आहे. म्हणूनच अनेक राजकीय पक्षांनी त्यांची सेवा घेतली. देशातील वेगवेगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांसोबत काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवला असला, तरी त्यांच्यावर टीका सुद्धा केली आहे. प्रशांत किशोर यांनी बिहारच्या राजकारणावरुन भाजपावर टीका केली आहे. भाजपाने बिहारच भविष्य बदलण्यात इंटरेस्ट दाखवला नाही. बिहारच्या मागासलेपणासाठी त्यांनी भाजपाला जबाबदार धरलय.

माधेपुरामध्ये मीडियाशी बोलताना प्रशांत किशोर यांनी भाजपाला टोले लगावले. बिहारच्या भवितव्याचा विचार न करता नितीश कुमार यांच्या हाती राज्य सोपवल्याबद्दल प्रशांत किशोर यांनी टीका केली. “विविध पक्ष फोडून भाजपाने अन्य राज्यात सरकार बनवलं. पण 2020 विधानसभा निवडणुकीत जेडीयूपेक्षा जास्त जागा जिंकूनही बिहारच भवितव्य बदलण्याची जबाबदारी उचलली नाही” अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. ‘फक्त 42 आमदार असलेल्या नितीश कुमारांकडे राज्य सोपवलं’ असं प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांचा आरोप काय?

“नितीश कुमारांवर खूप प्रेम आहे, म्हणून भाजपाने असं केलं नाही. बिहारमधून 30-35 खासदार निवडून आणण्यासाठी त्यांना नितीश कुमारांबरोबरच समीकरण कायम ठेवयाचय म्हणून भाजपाने हे केलं” असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे. ‘बिहारच्या लोकांसोबत काय होईल? याची भाजपाला अजिबात चिंता नाहीय’ असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला.

भाजपाने काय उत्तर दिलं?

बिहार भाजपाचे प्रवक्ते मनोज शर्मा यांनी प्रशांत किशोर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रशांत किशोर यांचे हे सर्व आरोप म्हणजे निव्वळ मूर्खपणा असल्याच त्यांनी म्हटलं आहे. ‘भाजपाने जे काही केलं, ते राज्याच हित डोळ्यासमोर ठेऊन केलं’ असं भाजपा प्रवक्ते मनोज शर्मा म्हणाले. “पीकेला 2005 आधीची बिहारची स्थिती माहित नाही. जेडीयू आणि आम्ही दोघांनी मिळून बिहारची RJD च्या जंगलराजमधून सुटका केली. राज्य आणि पक्षाच हित डोळ्यासमोर ठेऊन भाजपाने नितीश कुमार यांची मदत घेतली” असं मनोज शर्मा म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;