वायकर जिंकले काय अन् हरले काय? माझा काय दोष?; कीर्तिकर यांचं धक्कादायक विधान

वायकर जिंकले काय अन् हरले काय? माझा काय दोष?; कीर्तिकर यांचं धक्कादायक विधान

गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीचे लाचार व्हायचे आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी शिंदे गटाचे नेते शिशीर शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांच्या या मागणीनंतर शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मीडियाशी संवाद साधत आपली बाजू मांडली. मी पक्षविरोधी असं काही केलं नाही. माझं जे काही म्हणणं आहे, ते मी आमच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार आहे, असं सांगतानाच रवींद्र वायकर जिंकले काय आणि हरले काय? त्या माझा काय दोष? असा सवाल गजानन कीर्तिकर यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

रवींद्र वायकर हरले तर त्याचा दोष तुमच्याकडे जाणार नाही का? असा सवाल गजानन कीर्तिकर यांना करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी हे धक्कादायक उत्तर दिलं. वायकर समजा जिंकले काय? आणि हरले काय? माझा काय दोष? काय दोष आहे? अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील आणि पडतील. त्या प्रत्येक ठिकाणी कुणाला ना कुणाला दोष देणार का? असा दोष कुणाला देता येत नाही. राजकीय परिस्थितीनुसार निर्णय होतात. मतदार जे ठरवतो ते होत असतं. इथे हार आणि जीतचा प्रश्न येतो कुठे? प्रेस्टिजचा प्रश्न येतो कुठे?, असा सवाल गजानन कीर्तिकर यांनी केला.

मुलगा जिंकला तर आनंदच

अमोल कीर्तिकर जिंकले तर वडील म्हणून काय वाटेल? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर, मुलगा जिंकला तर नक्कीच आवडेल. अमोलचं जाऊ द्या. 48 ठिकाणी कोणी तरी जिंकणार, कोण तरी हरणार आहे. त्यात कुणाला आनंद होणार तर कुणाला वाईट वाटणार आहे, असंही कीर्तिकर म्हणाले.

तसे लढले नाही

मावळला मी चार पाच दिवस होतो. पार्थ पवार जेव्हा निवडणुकीला उभा होता तेव्हा अजित पवार गटाचे कार्यकर्ते ज्या जोमाने निवडणूक लढत होते, तसं लढताना आता दिसले नाही. त्यामुळे अजितदादा गटावर आरोप झाला असावा. तेव्हा त्यांचा उमेदवार होता. त्यांच्या उमेदवारांना रन करण्यासाठी ते जोरात कामाला होते. तेवढे कदाचित यावेळी नसतील, असं त्यांनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;