उद्धव ठाकरे यांचे धक्कादायक आरोप… देवेंद्र फडणवीस यांचं थेट उत्तर काय?

उद्धव ठाकरे यांचे धक्कादायक आरोप… देवेंद्र फडणवीस यांचं थेट उत्तर काय?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर धक्कादायक आरोप केले आहेत. सरकार मतदान कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी भाजपला अनुकूल वातावरण आहे, तिथे वेगाने मतदान होत आहे, इतर ठिकाणी मात्र संथगतीने मतदान केलं जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आरोपांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी आरोपांची माळ लावताच देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून जशास तसं उत्तर दिलं आहे. मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आवाहन काय?

माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.

ठाकरेंचे आरोप काय?

उद्धव ठाकरे यांनी मतदान केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. सरकार मतदान कमी होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही मतदान केंद्रावर जा. रांगेत उभे राहा. तुम्हाला मतदान करण्याची संधी मिळेल. तुम्ही रांगेत असाल आणि वेळ संपली तरी तुम्हाला मतदान करण्याची संधी द्यावी लागेल. लोकांना मतदान करायचं आहे. पण जाणूनबुझून त्यात विलंब केला जात आहे. 5 वाजले तरी रांगेत उभे राहा आणि मतदान करा. प्रक्रियेत उशीर केला जात असल्याचं आम्हाला सांगितलं गेलं आहे. सरकार निवडणूक आयोगाच्या नावाने खेळ खेळत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

कोर्टात जाऊ

ज्या ठिकाणी भाजपाला वातावरण अनुकूल आहे. त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया वेगाने होत आहे. मात्र, जिथे लोकांना शिवसेनेला मतदान करायचं आहे, तिथे निवडणूक प्रक्रियेत उशीर केला जात आहे. भाजप जाणूनबुजून असं करत आहे. आम्ही हा डेटा एकत्र करत आहोत. निवडणूक आयोगाच्या या पक्षपातीपणाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;