Mumbra Voting : मुंब्र्यात मतदान केंद्रावर गोंधळ, नागरिक खवळले, जितेंद्र आव्हाड म्हणाले…Video
मुंबई-ठाण्यात आज बहुतांश ठिकाणी नागरिकांमध्ये मतदानाचा मोठा उत्साह आहे. पण मतदानाच्या प्रक्रियेला बराच वेळ लागतोय. त्यामुळे मतदानासाठी गेलेले नागरिक तक्रारी करत आहेत. काही मिनिटांच्या मतदानासाठी काही तास लागतायत. काही मतदान केंद्रावर गोंधळ सुरु असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुंब्र्यात मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत. मुंब्र्यात नागरिकांमध्ये मतदानाचा मोठा उत्साह आहे. पण मतदान प्रक्रियेला वेळ लागत असल्याने नागरिक चिडले आहेत. मुंब्र्यात पोलीस ठाण्याजवळील बाबाजी सखाराम पाटील शाळेत मतदानासाठी गर्दी झाली आहे. एका महिला मतदाराने या ठिकाणी नाराजी व्यक्त केलीय.
“मतदान स्लो, स्लो होतय. तीन-चार तास झालेत. जो पर्यंत मतदान करायला मिळणार नाही, तो पर्यंत इथून जाणार नाही. रात्री 11 वाजून गेले तरी चालतील, मतदान करुनच जाईन” अस मतदानासाठी आलेल्या महिलेने ठणकावून सांगितलं. हे सर्व मुद्दामून सुरु आहे असं एक अन्य मतदार म्हणाला. “मी निवडणूक निरीक्षक मनोज जैनशी बोललो. काही अधिकारी मुद्दामून करतायत. खुसपट काढतायतय. हे इथेच नाही, कळव्यात सुद्धा चालू आहे. लोकांना परत पाठवल जातय” असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘अधिकारी गप्पा मारतायत, हसतायत, खेळतायत’, जितेंद्र आव्हाडांचा आरोप
“सहावाजता जो मतदार मतदानासाठी रांगेत उभा राहिलं, त्याला कितीही उशीर लागला, रात्रीचे 11 वाजू दे तरी तो मतदान करणारच. मी या बद्दल लवकरच एक व्हिडिओ पोस्ट करीन” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “कायदा आहे, तेच कायदा सांगतो. जेढा वेळ वाया जाईल, तेवढा मतदानाला द्यावाच लागेल. सहा वाजता जेवढी लोक इथे असतील तेवढ्या लोकांकडून मतदान करुन घ्यावच लागेल” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ‘अधिकारी मुद्दामून हे करतायत, गप्पा मारतायत, हसतायत, खेळतायत’ असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List