‘भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती’; शरद पवारांचं सर्वात मोठं वक्तव्य

‘भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती’; शरद पवारांचं सर्वात मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. 2004 साली राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या. मात्र त्यावेळी काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. याबद्दल एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच अजित पवारांना का मुख्यमंत्रीपद दिलं नाही? यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

2004 मध्ये पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्षात फूट पडली असती. तर अजित पवार हे राजकारणात नवखे होते, असं शरद पवार यांनी म्हणाले. 2004 निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 71 जागा तर काँग्रेस पक्षाला 69 जागा  मिळाल्या होत्या. मात्र काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्यात आला होता. त्यावेळी विलासराव देशमुख यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

शरद पवारांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया

1991 मध्ये मी शिवसेना पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेना-भाजपच्या विरोधात काम केलं म्हणून जीवघेणे हल्ले झाले होते. त्यानंतर 1995 ला युती सरकार आलं आणी मला विधान परिषदेतून आमदार करण्यात आलं. तेव्हा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं. 1999 ला शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यावर मी त्यांच्यासोबत गेलो होतो. काँग्रसने मला मुख्यमंत्रिपद देऊ असं सांगितलं मात्र मी पवार साहेबांची साथ दिली. जर त्यावेळी मी पवारांसोबत गेलो नसतो तर मुख्यमंंत्री झालो असतो, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली.

दरम्यान, राज्याचे उपमख्यमंत्री अजित पवार यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का केला नाही? असा सवाल अनेकवेळा केला. शरद पवार यांनी यावर भाष्य  केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;