INDIA आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, मोदींवर केला पलटवार
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाचव्या टप्पातील मतदान 20 मे रोजी संपन्न होत आहे. निवडणूक प्रचाराचा आजचा अखरेचा दिवस आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत होत आहे. महायुतीच्या प्रचाराची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाजीपार्क येथील सभेने झाली. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर, दुसरीकडे बीकेसी येथील झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजीपार्क येथील सभेत इंडिया आघाडीवर टीका करताना दुभंगलेले घर असल्याचा उल्लेख केला. तसेच, भारतात आघाडीचे सरकार बनले तरी पाच वर्षांत पाच पंतप्रधान होतील का? असा सवाल केला. यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर पलटवार केला आहे.
बीकेसी येथील सभेनंतर आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी आघाडीतील तीन प्रमुख पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, भारत आघाडीमध्ये पंतप्रधानपदासाठी अनेक संभाव्य उमेदवार आहेत. त्याचा निर्णय झाला आहे. मात्र, त्याचा खुलासा करण्याची आता गरज नाही. त्याचा खुलासा योग्य वेळी होईल. परंतु, सध्या देशाची लोकशाही आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हे भारतीय आघाडीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत भाषणांमध्ये भारत आघाडी हे दुभंगलेले घर असल्याचा उल्लेख करत आहेत. ते म्हणतात की आमच्यात पंतप्रधानपदासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा आहे. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणले, ‘मोदी यांनी निदान मान्य केले आहे की या पदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत. पण, भाजपकडे या पदासाठी विचार करण्यासारखा दुसरा कोणताही चेहरा नाही. एकच चेहरा आहे ज्याची मोजदाद नाही. पंतप्रधान सरकार स्थापन करणार का? असा खोचक सवालही त्यांनी केला.
विरोधी आघाडीच्या प्रचार सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले. पाकिस्तानचे णारे दिले गेले हे विरोधकांचे आरोप खोटे ठरवून फेटाळून लावले. ते म्हणाले, ‘जेव्हा मोदी यांना नवाझ शरीफ आणि त्यांनी पाकिस्तान दौऱ्यात खाल्लेली बिर्याणी आठवते. तेव्हाच ते असे खोटे बोलतात. अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीबद्दल भाजपने काही धक्कादायक माहिती दिली आहे. पुलवामा हल्ल्याला उत्तर देण्याऐवजी भाजप आमच्यावर निर्लज्जपणे हल्ला करत आहे अशी टीका त्यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List