मानसिक संतुलन ढासळलंय, मानसिक वैफल्यातून…; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
सध्या देशात लोकसभा निवडणुका होत आहेत. अशात जाहीक सभांचा धडाका सुरु आहे. ठिक-ठिकाणी प्रचार सभा होत आहेत. आरोप- प्रत्यारोपांच्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोकदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फडतूणवीस असा उल्लेख केला. यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. मानसिक वैफल्यातून केलेलं हे भाष्य आहे. त्यांनी हे विसरू नये, त्यांच्या नावाचाही अपभ्रंश होऊ शकतो. आमच्यावर संस्कार आहेत अन्यथा आम्ही उठाबशा कशा काढायच्या हे सांगू शकतो, असं आशिष शेलार म्हणालेत.
शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
इतका पळपुता माणूस पाहिला नाही. आधी ईव्हीएम मग मतदान टक्केवारी आता बोटाच्या शाईवर बोलतायेत. पराभव दिसू लागलाय म्हणून बेछूट आरोप करत आहेत, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची टोपी फिट बसली आहे, ते बोललेत. संघाच्या टोपीवर उद्धव जी तुम्ही टीका केलीय. मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या जाहीरनाम्याला पाठिंबा देत आहेत. म्हणजे त्यांना माओवादी जाहीरनामा मान्य आहे. जनता हे माफ करणार नाही, असं आशिष शेलार म्हणालेत.
इंडिया आघाडी पत्रकार परिषदेवर आशिष शेलारांनी टीका केली आहे. भ्रम निर्माण कोण करत आहे? पूर्ण निवडणुकीत भ्रम निर्माण करण्याची फॅक्ट्री महाविकास आघाडीची आहे. आरक्षण बदलणार कोणी म्हटलं कधी मोदींनी म्हटलं का? आमच्या जाहीरनाम्यात नाही. मग हे भ्रम उद्धव ठाकरे की शरद पवारसाहेब पसरवत आहेत?, असा सवाल आशिष शेलारांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List