अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन मातोश्रीत बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं?

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन मातोश्रीत बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन, अमित शाहांनी बाळासाहेबांच्या खोलीत काय म्हटलं. नेमकं काय ठरलं होतं याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी TV9च्या मुलाखतीत केला आहे. त्यावर फडणवीसांनीही नवे गौप्यस्फोट केले आहेत. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द कुठून आला ? आणि अमित शाह मातोश्रीवर येण्याआधीच कशी चर्चा थांबली हेही सांगितलं.

चर्चा थांबल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंनीच मध्यर्थ्याद्वारे मेसेज पाठवला आणि पुन्हा चर्चा सुरु झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरेंचा दाव्यावर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. स्वत: अमित शाहांसमोर उद्घव ठाकरेंनी मला, मी यू टर्न घेतो असं सांगितलं. आणि शिवसैनिकांना काही तरी मिळाल्यासारखं वाटेल असं पत्रकार परिषदेत बोला, हे उद्घव ठाकरेंनीच सांगितल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे..

जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच होता…तर मग त्यांनी जाहीरसभेतून का सांगितलं नाही, हे आतापर्यंत अमित शाह आणि फडणवीस विचारत होते…पण TV9च्या मुलाखतीतून त्यावर उद्धव ठाकरे बोलल्यानंतर आता 5-6 वर्षांनी सूचलं का असा सवाल फडणवीसांनी केला.

सुरुवातीचे अडीच वर्षे भाजपचेच होते आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्यानं आपण जाहीरसभेतून बोललो नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले मग, त्यावेळी माझा फोन का घेतला नाही ?, असा सवाल फडणवीसांनी केलाय.

आपण अडीच वर्षांचा शब्द दिलाच नाही, हे भाजपकडून नाकारलं जातंय. पण आई वडिलांसह उद्धव ठाकरे तुळजाभवनाची शपथ घेत आहेत. TV9च्या मुलाखतीतही उद्धव ठाकरेंनी त्याचा उल्लेख केला होता. पुढच्या 6 महिन्यात पुन्हा विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत..पण अजूनही 2019च्या निवडणुकीआधी बाळासाहेबांच्या खोलीतल्या बोलणीवरुन अजूनही खलबतं सुरुच आहे. ज्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरुन युती तुटली. पुढे शिवसेनेही फुटली. त्यावरुन उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या मुलाखतीतून दोघांच्याही बाजू समोर आल्यात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;