जिथे ओवैसी सारख्या औलादी आहेत, तिथे सैन्य घुसवा म्हणजे… राज ठाकरे मोदींना नेमकं काय म्हणाले?

जिथे ओवैसी सारख्या औलादी आहेत, तिथे सैन्य घुसवा म्हणजे… राज ठाकरे मोदींना नेमकं काय म्हणाले?

महायुतीच्या शिवाजी पार्कवरील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही मागण्या केल्या. यावेळी मुसलमानांबाबत बोलताना एमआयएमचे अध्यक्ष औवेसींचं नाव घेत मोदींकडे एक मागणी केली. राज ठाकरे यांनी नेमकी काय मागणी केली जाणून घ्या.

या देशात देशभक्त मुसलमान आहे. त्यांची देशावर निष्ठा आहेत. काही मूठभर आहेत. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्यांचा उद्देश त्यांना 1o वर्षात डोकंवर काढता आलं नाही. डोकंवर काढण्यासाठी काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही. मुस्लिम तुमच्यासोबत आहे. त्यांना तुमच्याबद्दल आदर आहे. त्यांना काम करायचे आहे. जे मूठभर आहेत. ओवैसी सारख्या औलादी आहेत. ज्यांचे जे अड्डे आहेत. ते अड्डे एकदा तपासून घ्या. तिथे माणसं घुसवा. तिथे देशाचे सैन्य घुसवा. म्हणजे आमच्या आया बहिणींना त्रास होणार नाही, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

९०च्या दशकात आपल्या कारसेवकांना ठार मारलं. मुलायम सरकारने ते केलं. बाबरीचा ढाचा पडला. राम मंदिर कधी होईल असं वाटत होतं. मनात आलं हे मंदिर कधी होणार नाही. मोदींना धन्यवाद देतो. तुम्ही होता म्हणून राम मंदिर होऊ शकलं. नाही तर ते झालंच नसतं. जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास स्वातंत्र्यानंतरचा इतिहास बघतो तेव्हा एक गोष्ट कानावर पडायची. ३७० कलम रद्द झालं पाहिजे. इतक्या वर्षात ती गोष्ट झाली नाही. ती मोदींनी केली. काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही जागा घेऊ शकता. तो भारताचा भाग आहे हे आता सिद्ध झाल्याचं राज ठाकरे म्हणाले.

राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा मोठी केस झाली होती. प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं. शहाबानोच्या बाजूने कोर्टाने निकाल लावला. त्यानंतर राजीव गांधींनी बहुमताच्या आधारे निकाल काढून टाकला. त्या बाईला न्याय मिळाला होता. तो काढून टाकला. एका छोट्या पोटगीसाठी. पण मोदींनी ती गोष्ट करून दाखवल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;