मी नशिबवान की बाबा माझ्या लहानपणीच गेले, कारण..; सखी गोखले असं का म्हणाली?
अभिनेत्री सखी गोखले हिने तिचे बाबा दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांच्या निधनावर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. बाबा लवकर गेल्याने तिच्याकडे बाबासोबतच्या आठवणी नसल्याचं ती म्हणाली आहे. मी प्रचंड लकी आहे की, मी खूप लहान असताना माझा बाबा गेला. तेव्हा इतकी लहान होते की, तेव्हाचं मला फारसं काही आठवतही नाही. आपण जसजसे मोठे होतो. तसं तसं आपल्याला गोष्टी कळायला लागतात. आपल्या आठवणी तयार व्हायला लागतात. पण मी लहान असताना बाबा गेल्यामुळे त्याच्यासोबतच्या स्ट्राँग आठवणी माझ्याकडे नाहीत. आई जवळची की बाबा हे कळायचं सुद्धा माझं वय नव्हतं…, असं सखी गोखले म्हणाली.
सखी गोखले बाबांच्या निधनाबाबत काय म्हणाली?
बाबा गेला तेव्हा मी केवळ सहा वर्षांची होते. त्या काळात बाबा प्रचंड काम करत होता. तो सतत कामात बिझी असायचा. त्यामुळे तेव्हा आई माझ्याजवळ होती. मला आईचीच सवय होती. त्यामुळे माझ्यासाठी बाबाचं जाणं तितकंस कठीण नव्हतं. आई-बाबांना गमावणं त्या मुलांसाठी कठीण आहे. जे कळत्या वयात आपल्या पालकांना गमाववात. त्यांच्यकडे पालकांसोबतच्या आठवणी असतात. त्यामुळे त्यांना यातून सावरणं कठीण असतं, असं सखी म्हणाली.
आईच्या मित्र-मैत्रिणींनी मला प्रेम दिलं- सखी
मी स्वत:ला फार लकी समजते की बाबा गेला तेव्हा माझा मेंदू तितकासा डेव्हलप झालेला नव्हता. त्यामुळे मला मनापासून वाटतं की हे चांगलं झालं की, मी लहान होते, असंही सखी पुढे म्हणाली. पण जरी बाबा नसला तरी माझ्या आजूबाजूचे लोक होते. त्यांनी मला सांभाळलं. मला प्रेम दिलं. माझे आजोबा, माझे नातेवाईक सोबत होते. आईचे मित्रमैत्रिणी त्यांनी मला प्रेम दिलं. तिच्या मैत्रिणींनी मला बाबांच प्रेम दिलं. त्यांनी माझ्यावर संस्कार केले, असं सखीने सांगितलं.
आईमधला एक गुण माझ्यातही आहे. तो म्हणजे माझे मित्रमैत्रिणी खूप आहेत. माझं सर्कल खूप चांगलं आहे. खूप चांगली लोकं आमच्याशी जोडली गेलेली आहेत, असंही सखी गोखले म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List