खेळ अजून संपलेला नाही, ठाकरे गटाचं मोठं पाऊल, रवींद्र वायकर आता काय उत्तर देणार?

खेळ अजून संपलेला नाही, ठाकरे गटाचं मोठं पाऊल, रवींद्र वायकर आता काय उत्तर देणार?

राजकारण म्हटलं की एका बाजूकडून दुसऱ्या बाजूवर कुरघोडी करणं हे आलंच. राजकारणात कुणीही एकमेकांचं कायमचं शत्रू किंवा कुणीही एकमेकांचं कायमचे मित्र देखील असू शकत नाही. गेल्या चार वर्षांपासूनच्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी हेच दर्शवत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील गेलं आहे. उद्धव ठाकरे यांचे अनेक जवळचे सहकारी त्यांना सोडून गेले आहेत. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ख्याती असणारे नेते रवींद्र वायकर यांनीदेखील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीदेखील देण्यात आलीय. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला शिंदे गटाने दुप्पट धक्का दिलाय. शिंदेंच्या या राजकीय चालीनंतर आता उद्धव ठाकरे यांनीदेखील दुसरी रणनीती आखली आहे.

रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. रवींद्र वायकर यांना ठाकरे गटाने नोटीस पाठवली आहे. रवींद्र वायकर हे आमदार आहेत. ते ठाकरे गटाचे आमदार आहेत. पण त्यांनी आता शिंदे गटात प्रवेश केलाय. तसेच ते शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला अपात्र का करु नये? अशी नोटीस ठाकरे गटाने रवींद्र वायकर यांना पाठवली आहे.

दुसरीकडे माझ्यावर झालेले सर्व आरोप खोटे आहेत, असं रवींद्र वायकर म्हणाले आहेत. ठाकरे गटात असताना मला वाचवायला हवं होतं. पण तसं झालं नाही, असा आरोप रवींद्र वायकर यांनी केला. एखाद्यावर आरोप झाले तर कुटुंब त्याच्यासोबत असतं, असंसुद्धा रवींद्र वायकर म्हणाले. रवींद्र वायकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी थोडक्यात आपली भूमिका मांडली.

रवींद्र वायकर नेमकं काय म्हणाले?

“माझ्यावर जे आरोप होत आहेत ते अत्यंत खोटे आहेत. हे आरोप त्यावेळेलाही होत होते. पण आता मी विरोधात उभा आहे. मला वाचवायला पाहिजे होतं तर त्यावेळेला वाचवलं गेलं नाही. कुटुंब मागे राहिलं नाही ते तिथे बोललो होतो. आता मी विरोधक म्हणून उभा आहे. आमची सत्ता येईलच. त्यातून काम करण्यासाठी मी उभा आहे”, असं रवींद्र वायकर म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान? उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान?
महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामुळं ठाकरे बंधूंसाठी सुद्धा ही निवडणूक वेगळी ठरली. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केलं. तर...
संथ गतीनं मतदानावर उद्धव ठाकरेंचा संताप, पियुष गोयलही भडकले!
देशभरातून महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान, कुणाला संधी?
मधमाशांचा हल्ला झाला तर हे काम करा, हे चार उपाय फायद्याचे
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात हिंगोली अव्वल! मराठवाड्यात प्रथम तर राज्यात पाचव्या क्रमांकावर
बीड, बारामतीत बोगस मतदान झाले! शरद पवार यांचा स्पष्ट आरोप
मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही! मनोज जरांगे पाटील यांचा खुलासा, 4 जूनपासून उपोषणावर ठाम