कंगनाची जीभ घसरली; RJD नेत्याऐवजी भाजपच्या तेजस्वी सूर्यांचं नाव घेऊन केली टीका

कंगनाची जीभ घसरली; RJD नेत्याऐवजी भाजपच्या तेजस्वी सूर्यांचं नाव घेऊन केली टीका

हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचं घोषित झाल्यापासून अभिनेत्री कंगना राणौत सतत चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्यासाठी कंगना जोरदार प्रचार करत आहे. अशातच एका रॅलीदरम्यान कंगनाकडून मोठी चूक झाली. राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांचं नाव घेण्याऐवजी तिने चुकून तिच्याच पक्षातील म्हणजेच भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचं नाव घेतलं. मासे खाण्यावरून कंगनाला तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधायचा होता. हिमाचल प्रदेशातील एका रॅलीदरम्यान तिने हे वक्तव्य केलं. शनिवारी तिच्याच मंडी मतदारसंघात या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

या रॅलीमध्ये विरोधकांवर टीका करताना कंगना म्हणाली, “ही बिघडलेल्या शहजादांची (राजकुमार) पार्टी आहे. त्यांनाच माहित नाही की त्यांना कुठे जायचं आहे. मग ते राहुल गांधी असो, ज्यांना चंद्रावर बटाटे उगवायचे असतील किंवा मग तेजस्वी सूर्या असो जे गुंडगिरी करतात आणि मासे खातात.” कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यावर तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली. “ये मोहतरमा कौन है (या मॅडम कोण आहेत?)”, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.

गेल्या महिन्यात तेजस्वी यादव यांचा एख व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते विकासशील इंसान पार्टीचे (VIP) प्रमुख मुकेश साहनी यांच्यासोबत प्रचारानंतर हेलिकॉप्टरमध्ये मासे खाण्याचा आनंद घेताना दिसले होते. या व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी जोरदार टीका केली होती. नवरात्रीच्या दिवसांत मासे खाल्ल्याने तेजस्वी यादव यांच्यावर टीका झाली होती. नंतर तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केलं होतं की तो व्हिडीओ नवरात्री सुरू होण्याच्या काही दिवस आधी शूट करण्यात आला होता.

हिमाचल प्रदेशातील रॅलीदरम्यान कंगनाने केवळ तेजस्वी यादव आणि तेजस्वी सूर्या यांच्या नावातच गोंधळ केला नाही तर तिने काँग्रेसच्या दिवंगत नेत्यांवरही टीका केली, ज्यांच्यामुळे पार्टीने तिच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. “माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू हे त्यांच्या काळातील अंबानी होते, परंतु त्यांची संपत्ती आणि मालमत्ता कुठून आली हे कोणालाच माहित नाही. ते ब्रिटिशांच्या जवळचे होते आणि त्यांना संपत्ती कुठून मिळाली हे आजवर गुपितच आहे”, अशा शब्दांत कंगनाने निशाणा साधला होता.

“जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान कसे झाले हे कोणालाच माहित नाही, कारण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बाजूने मतदान झालं होतं. तेव्हापासून घराणेशाही नावाच्या किड्याने या देशाला संक्रमित केलंय. एकीकडे आपल्याकडे ‘तपस्वींचं सरकार’ (भाजप सरकार) आहे आणि दुसरीकडे आपल्याकडे ‘भोगी लोकांचं सरकार’ (काँग्रेस) आहे, जे शहजादांच्या छोट्या टोळ्यांनी बनलेली आहे. एक दिल्लीत आहे आणि दुसरी इथे हिमाचल प्रदेशमध्ये आहे”, मंडीमधील काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंग यांच्यावर निशाणा साधत तिने ही टीका केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;