मी एकदा मातोश्रीत गेलो, साहेबांच्या केबिनमध्ये तीन लोक पैसे मोजत होते… नारायण राणे यांचा गंभीर आरोप

मी एकदा मातोश्रीत गेलो, साहेबांच्या केबिनमध्ये तीन लोक पैसे मोजत होते… नारायण राणे यांचा गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खोक्याबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये. त्यांनी कधी खोके घेतले नाही? मी एकदा संध्याकाळी 7.30 वाजता मातोश्रीमध्ये गेलो होतो. साहेबांच्या केबिनमध्ये तीन माणसे पैसे मोजत होते. मी हे साहेबांच्या कानावर घातलं. उमेदवारी देताना त्यांच्याकडून पैसे घेत होते, असा गंभीर आरोप करतानाच दमबिम द्यायचं काम तुमचं नाही. आम्ही सोडलं आणि तुमच्याकडे आलं असं काही नाही. तुम्ही कोणाला गाडणारं? आम्ही कृती करणारी माणसे आहोत, नुसतीच बोलणारी नाही, असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

तळकोकणात काल नारायण राणे यांची मोठी सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. माझ्या एका फोनवर राज ठाकरे कोकणात आले आहेत. शब्द द्यावा, तो पूर्ण करावा त्याला म्हणतात राज ठाकरे. राज ठाकरे माणुसकी जोपासणारे नेते आहेत. मैत्रीचे पावित्र्य टिकवणारे नेते आहेत. वक्तृत्व म्हणजे राज ठाकरे. दुसरे ठाकरे (उद्धव)… नवीन शर्ट पाहिला तरी कुठून आणला असेल अस विचारतात. विकृती म्हणजे उद्धव ठाकरे आहे. हा दोन ठाकरेंमधील फरक आहे, असा हल्लाच नारायण राणे यांनी चढवला.

फक्त नोकरीचा प्रश्न उरलाय

मोदींनी एका बाजूला मोफत धान्य दिल तर हे कोरोना काळात वॅक्सिनमध्ये कमिशन मागत होते. आपल्या राज्यात अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी गोरगरीब जनतेसाठी काय केलं? असा सवाल करतानाच कोकणात फक्त नोकरीचा प्रश्न उरलाय तो सोडवायचा आहे, असंही नारायण राणे म्हणाले.

कुठून आणलं विमानतळ?

प्रफुल्ल पटेल विमान वाहतूक मंत्री असताना एकदा माझ्याकडे गोंदियाचे काम घेऊन आले. मी म्हटलं मला सिंधुदुर्गात विमानतळ द्या, मी तुमचं काम करतो. त्यांनी उद्या सांगोत म्हणाले. त्यानंतर आम्ही कोकणात विमानतळ आणलं. आता हे क्रेडिट घेत आहेत. आम्हीच विमानतळ आणलं म्हणून सांगत आहेत. कुठून आणल रे बाबा? दुकानातून? असा सवाल करतानाच मी या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण करणार आहे. माझी क्षमता तुम्हाला माहिती आहे. 34 वर्षे तुमच्या सानिध्यात वावरताना मला तुमचं प्रेमच मिळालं आहे. बाळासाहेब यांच्यामुळे मला अनेक पदे मिळाली. आज बाळासाहेब हवे होते. जे वणवण फिरत आहेत, त्यांना असं फिरायची वेळ आली नसती, असा चिमटाही त्यांनी काढला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;