द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीवर टीका करताना त्यांच्यावर अदानी व अंबानीकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला. मात्र मोदींचे हे आरोप आता त्यांच्यावरच भारी पडताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी या टीकेवर पलटवार करताना ”मोदीजी अदानी अंबानी पैसे देतात हे तुम्हाला कसं माहित”, अशी गुगली टाकली. मोदींच्या आरोपावरु राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांच्यावर टीका करत टोले लगावले आहेत.
मोदीजींचा टेलिप्रॉम्पटर या निवडणुकीत चांगलाच गंडलेला दिसतोय. राहुल गांधीच्या जाळ्यात ते अडकताना दिसतायत.
निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात.
मोदीजींनी अदानी-अंबानींचं पहिल्यांदा जाहीरपणे नाव घेऊन आपल्या सच्च्या मित्रांना खोटं… pic.twitter.com/YSkVTIezce— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 8, 2024
”मोदीजींचा टेलिप्रॉम्पटर या निवडणुकीत चांगलाच गंडलेला दिसतोय. राहुल गांधीच्या जाळ्यात ते अडकताना दिसतायत. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात. मोदीजींनी अदानी-अंबानींचं पहिल्यांदा जाहीरपणे नाव घेऊन आपल्या सच्च्या मित्रांना खोटं आणि भ्रष्टाचारी ठरवण्याचा प्रयत्न केलाय. देशाने याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List