मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी शब्द; शिवसेनेचा फेरविचार अर्ज आयोगाने फेटाळला

मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी शब्द; शिवसेनेचा फेरविचार अर्ज  आयोगाने फेटाळला

मशाल गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दिले होते. त्यावर शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे अर्ज करून या आदेशाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. पण शिवसेनेचा हा अर्ज निवडणूक आयोगाच्या माध्यम प्रमाणपत्र व सनियंत्रण समितीने फेटाळला आहे. दरम्यान, त्याविरोधात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे दाद मागण्याचा पर्याय शिवसेनेकडे आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे दोन्ही शब्द मशाल गीतातून वगळणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बजरंगबली व प्रभू श्रीरामाच्या नावावर मते मागतात ते चालते का? आधी त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. हुकुमशाहीसमोर शिवसेना झुकणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीवर टीका करताना त्यांच्यावर अदानी व अंबानीकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला. मात्र मोदींचे हे...
मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच…
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जे पी नड्डा यांना पोलिसांचे समन्स 
‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने..
दांदावर दादा नाराज, अजित पवारांसमोर असं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
समाधान पाटील याचा राजकीय खूनच! खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर संशय
ग्रामपंचायतप्रमाणे निवडणूक लढवा ! नीलेश लंके यांचे कार्यकर्त्याना आवाहन